शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

By नारायण जाधव | Updated: January 25, 2024 15:15 IST

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत.

नवी मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाच्या भिवंडीत मंगळवारी झालेल्या बैठकीत युवक काँग्रेसने ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपण ठाण्यातून इच्छुक असल्याचे पत्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. हॅटट्रिक पूर्ण केलेले विद्यमान खासदार विचारे यांची दावेदारी मजबूत असताना येथून युवक काँग्रेसने दावा ठोकल्याने हा इंडिया आघाडीतील ठाकरे गटाला धक्का दिल्याचे मानले जात आहे

काँग्रेस पक्षाकडून राज्यात विभागनिहाय बैठका सुरू असून त्यात कार्यकर्त्यांची मते अजमावून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत विदर्भ, पुणे विभागाच्या बैठका पार पडल्या आहेत. मंगळवारी कोकण विभागाची बैठक भिवंडीत पार पडली. तीत रमेश चेन्निथला यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटून आपण ठाण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पत्र अनिकेत म्हात्रे यांनी दिले आहे. त्यांच्या मागणीस नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्यासह इतर आघाड्यांचा पाठिंबा आहे.

काय म्हटले आहे म्हात्रेंनी पत्रातगेल्या दोन-तीन दशकांतील राजकीय परिस्थितीचा विचार करता, हे स्पष्ट होते की १९९० च्या दशकात ठाण्यात काँग्रेसचे लक्षणीय अस्तित्व आणि एकनिष्ठ मतदारांचा आधार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत ठाणे लोकसभेची जागा काँग्रेसने मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नकळत निराशा झाली आहे. यामुळे दुर्दैवाने ठाण्यामधील काँग्रेसचा प्रभाव आणि प्रतिनिधित्व कमकुवत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या रणनीतीचे पूनर्मूल्यांकन करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत उपरोक्त नेत्यांसह अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्वरू, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनाही दिली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून संघटनेमध्ये काँग्रेससाठी निष्ठेने काम करत असून, पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. ‘काही तरी कर नवी मुंबईकर’ या लोकचळवळीच्या माध्यमातून नवी मुंबईतील सामान्य जनतेची मोठी ताकद उभी केली असून, ती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पसरवू शकते, असा विश्वास आहे.- अनिकेत म्हात्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस