शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

By नारायण जाधव | Updated: January 25, 2024 15:15 IST

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत.

नवी मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाच्या भिवंडीत मंगळवारी झालेल्या बैठकीत युवक काँग्रेसने ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपण ठाण्यातून इच्छुक असल्याचे पत्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. हॅटट्रिक पूर्ण केलेले विद्यमान खासदार विचारे यांची दावेदारी मजबूत असताना येथून युवक काँग्रेसने दावा ठोकल्याने हा इंडिया आघाडीतील ठाकरे गटाला धक्का दिल्याचे मानले जात आहे

काँग्रेस पक्षाकडून राज्यात विभागनिहाय बैठका सुरू असून त्यात कार्यकर्त्यांची मते अजमावून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत विदर्भ, पुणे विभागाच्या बैठका पार पडल्या आहेत. मंगळवारी कोकण विभागाची बैठक भिवंडीत पार पडली. तीत रमेश चेन्निथला यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटून आपण ठाण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पत्र अनिकेत म्हात्रे यांनी दिले आहे. त्यांच्या मागणीस नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्यासह इतर आघाड्यांचा पाठिंबा आहे.

काय म्हटले आहे म्हात्रेंनी पत्रातगेल्या दोन-तीन दशकांतील राजकीय परिस्थितीचा विचार करता, हे स्पष्ट होते की १९९० च्या दशकात ठाण्यात काँग्रेसचे लक्षणीय अस्तित्व आणि एकनिष्ठ मतदारांचा आधार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत ठाणे लोकसभेची जागा काँग्रेसने मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नकळत निराशा झाली आहे. यामुळे दुर्दैवाने ठाण्यामधील काँग्रेसचा प्रभाव आणि प्रतिनिधित्व कमकुवत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या रणनीतीचे पूनर्मूल्यांकन करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत उपरोक्त नेत्यांसह अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्वरू, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनाही दिली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून संघटनेमध्ये काँग्रेससाठी निष्ठेने काम करत असून, पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. ‘काही तरी कर नवी मुंबईकर’ या लोकचळवळीच्या माध्यमातून नवी मुंबईतील सामान्य जनतेची मोठी ताकद उभी केली असून, ती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पसरवू शकते, असा विश्वास आहे.- अनिकेत म्हात्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस