शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 1:24 AM

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.

नवी मुंबई : कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे. घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून पोलिसांनी २८४ दाम्पत्यांना सुखी संसाराचा कानमंत्र दिला आहे. अशा दाम्पत्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या नेरुळमध्ये उपस्थित होत्या.गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षामार्फत गतवर्षात २८४ संसारांचा काडीमोड थांबवला आहे. पती-पत्नीमधील वादाच्या प्राप्त तक्रारीवरून त्यांचे समुपदेशन करून गैरसमज दूर केले आहेत. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरीलही ताण कमी झाला आहे. त्यानुसार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नव्याने सुखाचा संसार थाटणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेरुळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती नीलम गोºहे, पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाणे, अशोक दुधे, सुरेश लोखंडे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी नीलम गोºहे यांनी पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या आईवडिलांप्रमाणेच पती-पत्नीच्या आईवडिलांचाही सन्मान केल्यास बरेच कौटुंबिकवाद मिटतील, असा उपस्थितांना सल्ला दिला. मात्र, जे दाम्पत्य काही केल्या एकत्र होण्याच्या मन:स्थितीत नसतात त्यांच्या वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याची भावनाव्यक्त केली.अशा अनेक दाम्पत्यांचे खटले पोटगी, हुंडाबळी, मुलांची कस्टडी यासह विविध कायद्यांतर्गत एकाच वेळी वेगवेगळ्या कोर्टात चालतात. यामध्ये निकाल लागण्यास होणाºया विलंबाचा मनस्ताप पती-पत्नीसह त्यांच्या मुलांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे असे विविध खटले एकत्र चालवले जावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोºहे म्हणाल्या. तर घटस्फोटाच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्यांच्या मुलांना मानसिक आधार देण्यासाठीचाही आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही बदलत्या कुटुंब व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. हल्ली प्रत्येक पती-पत्नीला एकमेकांपासून ‘स्पेस’ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, दोघांनाही हा स्पेस नेमका हवा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लग्नानंतर सामंजस्याने राहायचे आणि संसार टिकवायचे दोघांवरही अवलंबून असते. त्यामुळे संबंध तुटण्यापूर्वीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा तुटलेले संबंध जोडल्यानंतरही त्याच्या गाठी आयुष्यभर राहतात, असा सल्लाही त्यांनी दिला.अल्पवयीन मुला-मुलींकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असताना पालकांचे त्यांच्यावर नियंत्रण हवे. अन्यथा त्यांचे तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सदैव सर्तक राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे