शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का?

By नारायण जाधव | Updated: October 7, 2024 10:29 IST

नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. भूखंडाचे श्रीखंड, चटई क्षेत्रामागील ठेकेदारी आणि टक्केवारीमुळे पुनर्विकास म्हणजे बिल्डर, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसह भूमाफियांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. शहरात जी काही पुनर्विकासाची कामे झाली आहेत किंवा सुरू आहेत, ती पाहिली तर नगरविकास, महसूल, सहकार विभागाचे नियम पायदळी तुडवून सर्वसामान्यांची दिशाभूल करून राज्यकर्ते आणि बिल्डर आपल्या तुंबड्या कसे भरतात, याचा प्रत्यय येत आहे. पुनर्विकासातील या वाटमाऱ्या रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एसओपी लागू केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.

३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हल्ली कमी वयोमान असलेल्या भक्कम इमारतीही धोकादायक ठरविण्यात येत आहेत. त्यासाठी रहिवाशांना धाकदपटशा, धमक्या देऊन अथवा आर्थिक गाजर दाखविले जात आहे. 

पुनर्विकासासाठी गृहनिर्माण, नगरविकास आणि सहकार विभागाने जे हाउसिंग मॅन्युअल आणले होते, ते कधीच वाशीच्या खाडीत बुडवून सिडको, महापालिकेच्या नगरचना विभागाने आपसांत संगनमत करून इप्सित साध्य केले आहे. वाशीतील सेक्टर १ मध्ये शहरांतील पहिल्यांदा पुनर्विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर हे लोण सिडको क्षेत्रातील खारघर, कळंबोली, पनवेलपर्यंत गेले. यासाठी राज्यकर्ते, बिल्डर, महापालिका, सिडको, बँक अधिकाऱ्यांचे एक मोठे सिंडिकेट सक्रिय झाले आहे. वाशीतील एका पुनर्विकास प्रकल्पात, तर रहिवाशांशी केलेला करारनामा, प्रत्यक्षात घरांचे चटईक्षेत्र, बँकांकडील कागदपत्रे यात मोठा झोल आहे. ज्या सदनिका, दुकानांवर आधीच पहिल्या बँकेचे कर्ज आहे, अशा मालमत्ताही पुन्हा दुसऱ्या बँकेकडे पुन्हा गहाण ठेवल्या आहेत. २०२० झाली नवीन बांधकाम नियंत्रण नियमावली आल्यापासून तर छोटे रस्ते मोठे दाखवून, उद्याने, बगिचे हेसुद्धा त्या भूखंडाचा भाग दाखवून पुनर्विकासाचा मलिदा लाटण्याचे प्रकार काही ठिकाणी घडल्याच्या तक्रारी आहेत.

पुनर्विकासासाठी आवश्यक नियमावलीला तिलांजली दिलेली दिसते. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भेतील मॅफ्कोत तिचे सर्रास उल्लंघन झाले आहे. वाशी सेक्टर-९, १० सोडाच परंतु, अलीकडे सेक्टर-२ व सेक्टर-१६ मध्ये जो पुनर्विकास करण्यात येत आहे, त्यासाठी खोदकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्याने धुळीचे लोट सेक्टर २, आणि १७ पर्यंत पसरत आहेत. खोदकामातून निघणाऱ्या मातीची योग्य विल्हेवाट लावण्यात कुचराई करून महसूलची रॉयल्टीसुद्धा बुडविण्यात येत आहे.

अनेक प्रकरणांत इमारती धोकादायक नसतानाही खासगी संस्थेचा संरचनात्मक परीक्षण अहवाल सादर करून त्या धोकादायक दाखविल्याचे उघड झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ३० वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षणासाठी आयआयटीचा अहवाल ग्राह्य मानला जाईल, असे आदेश काढले आहेत. हे चांगले पाऊल असले तरी बिल्डर आयआयटी पॅनलवरील  प्राध्यापकांचा अहवाल सादर करेल, तरी त्यांच्या अहवालास प्रत्यक्ष आयआयटीची मान्यता आहे, की नाही, हे तपासणे गरजे आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई