शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नव्या धरणांचा भार पालिकांवर कशासाठी?

By नारायण जाधव | Updated: May 26, 2025 10:19 IST

महायुती सरकारने धरणांचा भार नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर पालिकांवर टाकला आहे.

नारायण जाधवउपवृत्तसंपादक

नैनासह परिसराचा महामुंबई विकास झपाट्याने होत आहे. एमएमआरडीएच्या या आराखड्यानुसार राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशात राहते. येथील शहरी भागात १२४५ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार, या भागाची २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लिटर होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लिटरवर जाणार आहे. लोकसंख्या वाढली असली तरी बारवीची उंची आणि मध्य वैतरणासह सूर्या वगळता पाण्याच्या स्रोतात तसूभरही वाढ झालेली नाही. यामुळेच सरकारने आता नवी मुंबईसह नैना, पनवेल आणि उल्हासनगर, अंबरनाथची तहान भागविण्यासाठी पोशिर आणि शिलार या दोन धरणांना मंजुरी दिली असली तरी त्यासाठी इंचभरही जमीन संपादित केलेली नाही. आधी प्रस्तावित केलेली काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, देहर्जे, सुसरी ही धरणे गंटागळ्या खात आहेत. यात भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. निधी उभा करण्याचे आव्हान लक्षात घेऊन महायुती सरकारने या धरणांचा भार नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर पालिकांवर टाकला आहे.

'एमएमआरडीए'च्या अहवालानुसार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ७९० दशलक्ष लिटर तुटवडा आहे. तर वसई-विरार आणि मीरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्यात ३०८ दशलक्ष लिटर तुटवडा आहे. उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लिटर असली तरी सध्या १२१२ लिटरच पाणी मिळत आहे. तर कर्जत-खालापूर-खोपोली भागाची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लिटर असली तरी या परिसराला उल्हास खोऱ्यातून २४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून, १२ दशलक्ष लिटर तुटवडा आहे. नवी मुंबई विमानतळामुळे विकास होत असलेल्या खोपटा परिसराची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लिटर आहे. अशातच नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूनजीक केएससी अर्थात कर्नाळा-साई-चिरनेर परिसरातील १२४ गावांत एमएमआरडीए दुबई, शांघायच्या धर्तीवर हे नवे शहर वसवित असल्याने पाण्याची गरज वाढणार आहे.

११,२६३ कोटींचा भार 

नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र, नवी मुंबईचे पाणी ठाण्यातील नेत्यांनी पळविल्याने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांनी शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन भीरा, कुंडलिकातून पाणी द्यावे, नव्या धरणांचा पर्याय उभा करावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता पोशिर आणि शिलार धरणांना मंजुरी मिळाली आहे. ते वनमंत्री असल्याने धरणांच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर होण्यास मदत होईल. परंतु, पोशिरचा ६,३९४ कोटी आणि शिलारसाठीचा ४ हजार ८६९ कोटी असा ११,२६३ कोटींचा भार महापालिकांना पेलवेल का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDamधरण