शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नव्या धरणांचा भार पालिकांवर कशासाठी?

By नारायण जाधव | Updated: May 26, 2025 10:19 IST

महायुती सरकारने धरणांचा भार नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर पालिकांवर टाकला आहे.

नारायण जाधवउपवृत्तसंपादक

नैनासह परिसराचा महामुंबई विकास झपाट्याने होत आहे. एमएमआरडीएच्या या आराखड्यानुसार राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशात राहते. येथील शहरी भागात १२४५ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार, या भागाची २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लिटर होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लिटरवर जाणार आहे. लोकसंख्या वाढली असली तरी बारवीची उंची आणि मध्य वैतरणासह सूर्या वगळता पाण्याच्या स्रोतात तसूभरही वाढ झालेली नाही. यामुळेच सरकारने आता नवी मुंबईसह नैना, पनवेल आणि उल्हासनगर, अंबरनाथची तहान भागविण्यासाठी पोशिर आणि शिलार या दोन धरणांना मंजुरी दिली असली तरी त्यासाठी इंचभरही जमीन संपादित केलेली नाही. आधी प्रस्तावित केलेली काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, देहर्जे, सुसरी ही धरणे गंटागळ्या खात आहेत. यात भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. निधी उभा करण्याचे आव्हान लक्षात घेऊन महायुती सरकारने या धरणांचा भार नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर पालिकांवर टाकला आहे.

'एमएमआरडीए'च्या अहवालानुसार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ७९० दशलक्ष लिटर तुटवडा आहे. तर वसई-विरार आणि मीरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्यात ३०८ दशलक्ष लिटर तुटवडा आहे. उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लिटर असली तरी सध्या १२१२ लिटरच पाणी मिळत आहे. तर कर्जत-खालापूर-खोपोली भागाची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लिटर असली तरी या परिसराला उल्हास खोऱ्यातून २४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून, १२ दशलक्ष लिटर तुटवडा आहे. नवी मुंबई विमानतळामुळे विकास होत असलेल्या खोपटा परिसराची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लिटर आहे. अशातच नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूनजीक केएससी अर्थात कर्नाळा-साई-चिरनेर परिसरातील १२४ गावांत एमएमआरडीए दुबई, शांघायच्या धर्तीवर हे नवे शहर वसवित असल्याने पाण्याची गरज वाढणार आहे.

११,२६३ कोटींचा भार 

नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र, नवी मुंबईचे पाणी ठाण्यातील नेत्यांनी पळविल्याने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांनी शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन भीरा, कुंडलिकातून पाणी द्यावे, नव्या धरणांचा पर्याय उभा करावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता पोशिर आणि शिलार धरणांना मंजुरी मिळाली आहे. ते वनमंत्री असल्याने धरणांच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर होण्यास मदत होईल. परंतु, पोशिरचा ६,३९४ कोटी आणि शिलारसाठीचा ४ हजार ८६९ कोटी असा ११,२६३ कोटींचा भार महापालिकांना पेलवेल का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDamधरण