शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बुलेट ट्रेनसह मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात काय झाला घोटाळा? कोकण आयुक्त करणार चौकशी

By नारायण जाधव | Updated: February 24, 2023 19:41 IST

ठाणे, पालघरमधील अनेक प्रांत, तहसीलदार येणार अडचणीत : ९ आमदारांनी केले १५ होते प्रश्न

नवी मुंबई : राज्यातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, मुंबई-बडोदा महामार्ग, विरार-डहाणू रेल्वे मार्गासह कुशिवली धरणासाठी महसूल विभागाने जे भूसंपादन केले आहेत, त्यात स्थानिक तहसीलदार, प्रांतांनी चुकीच्या नोंदी करून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचे आरोप गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशानात अनेक आमदारांनी केले होते. त्यावर महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता उशिरा का होईना या आराेपांची चौकशी करून दोषींवर कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी महसूल विभागाने २३ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण विभागीय आयुक्तांची तीन सदस्यीच चौकशी समिती स्थापन केली आहे.

यामुळे या प्रकल्पांचे भूसंपादन करणाऱ्या तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी अशा काही प्रकरणात दोन प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यातील सध्या अनेक विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात प्रमुख प्रकल्प म्हणजे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह जेएनपीटी ते दिल्ली फ्रेट कॉरिडोर, मुंबई-बडोदा महामार्ग, विरार-डहाणू रेल्वे मार्गासह कुशिवली धरणासाठी मोेठ्या प्रमाणात जमीन संपादन केली आहे. मात्र, ही जमीन संपादन करताना शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी चुकीच्या नाेंदी करून शेतकऱ्यांना नाडले आहे. यात आदिवासींची संख्या मोठी आहे. याबाबत काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यात अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भूसंपादनात गैरप्रकार झाल्याचा आरोप अंबरनाथचे आमदार किसन कथोरे आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता.

प्रसाद लाड, विनोद निकाेले यांनी बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाच्या गैरप्रकारांचा पाढा वाचला होता. मनीषा कायंदे, शांताराम मोरे यांनी आदिवासी शेतकऱ्यानां देण्यात येणाऱ्या मोबदल्यातील गैरप्रकाराबाबत विधिमंडळात आवाज उठविला होता. तसेच निकाेले यांनी विरार-डहाणू रेल्वे मार्गासह मुंबई-बडोदा महामार्गाच्या भूसंपादनाच्या गोंधळ सांगितला होता. याशिवाय संजय रायमुलकर, शरद यशवंत पाटील, नरसिंह जनार्दन पाटील या सदस्यांनीही बुलेट ट्रेनसह आदिवासी जमीन संपादनाबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याचे आरोप हिवाळी अधिवेशनात केले हाेते.

२१ मार्च २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशकोकण आयुक्तांसह भूसंपादन विभागाचे उपायुक्त आणि ठाणे येथील भूसंपादन शाखेचे समन्वय अधिकारी असे तीन अधिकार्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. अधिवेशनात केलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर विभागीय चौकशी अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील अहवाल २१ मार्च २०२३ पर्यंत सादर करण्यास या समितीस सांगितले आहे.

दोन अधिकाऱ्यांना केले आहे निलंबितबुलेट ट्रेन आणि मुंबई-वडोदरा मार्गाचे भूसंपादन आणि इतर तक्रारींच्या अनुषंगाने आतापर्यंत भिवंडीचे प्रातांधिकारी मोहन नळदकर आणि बाळासाहेब वाकचौरे या दोघा अधिकाऱ्यांना हिवाळी अधिवेशनातच मंत्र्यांनी निलंबित केले आहे. यामुळे आता कल्याण, उल्हासनगरसह पालघरमधील अनेक तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांचेही चौकशी समितीमुळे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईBullet Trainबुलेट ट्रेन