शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
2
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
3
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
4
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
5
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
6
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
7
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
8
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
9
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
10
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
12
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
13
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
14
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
15
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
16
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
17
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
18
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
19
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
20
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर पाणी; विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:48 IST

आॅक्टोबर हिटने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने सुखद गारवा दिला.

नवी मुंबई : आॅक्टोबर हिटने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने सुखद गारवा दिला. हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून, भरदुपारी अचानक काळोख झाला आणि मुसळधार पावसाला सुरु वात झाली. सकाळपासून पावसाची कसलीच चाहूल न लागताच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना अडोसा शोधून रक्षण करावे लागले तर बाइकस्वारांनाही वाहन थांबवून अडोशाचा शोध घ्यावा लागला. दिवाळी फराळ, तसेच सजावटीचे साहित्य खरेदीकरिता नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातून तुर्भेत मॅफ्को मार्केट येथे खरेदीसाठी येणा-या ग्राहकांचा हिरमोड झाला.अचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची तारांबळ उडाल्याने खरेदीचा उत्साह कमी झाल्याचा असंतोष व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला. यंदा दिवाळी तरी साजरी करता येणार की नाही, अशी धास्ती नागरिकांमध्ये आहे. दुपारपासून जोर धरलेल्या या पावसाने कार्यालयातून काम उरकून बाहेर पडणाºया नोकरदारवर्गापुढे प्रश्नचिन्ह उभे केले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या जोरदार पावसाने अनेक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सप्टेंबरच्या अखेरपासून उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मात्र या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा दिला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या पावसाने कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याची माहिती दिली. सोसाट्याच्या वाºयासह झालेल्या या पावसामुळे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. सखल भागात भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढणे मुश्कील झाले.बाजारपेठेला पावसाचा फटकासर्वत्र दिवाळीच्या बाजारपेठा सजल्या असून, अचानक येणाºया पावसाच्या सरींमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. रांगोळी, दिवे, आकाशकंदील तसेच कपड्यांच्या विक्रेत्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून, खरेदीही मंदावली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीकरिता नोकरदारवर्गासाठी असलेला अखेरच्या वीकेण्डवरही पावसाने पाणी फेरले. त्यामुळे बाजारपेठा रिकाम्या झाल्याने व्यापारी वर्ग, विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवाळीनिमित्त कपड्यांच्या खरेदीवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले.बाजारपेठा झाल्या रिकाम्याकडकडाटासह पाऊस झाल्याने अनेकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले. कापड बाजारात फारशी गर्दी आढळून आली नाही. शहरातील सराफी पेढ्यासुद्धा थंड दिसून आल्या. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातही फारसे ग्राहक दिसले नाहीत.वातावरणात बदलगेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारी असह्य उकाडा आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाच्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. या वातावरणामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, दुपारी तापमानाचा वाढत आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेलापूर विभागात १९.३ मि.मी., नेरुळ विभागात २६.४ मि.मी., वाशीत ९.६ मि.मी. आणि ऐरोलीत ९.६ मि.मी. अशा सरासरी १६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली.शेतमालाचे नुकसानपरतीच्या पावसामुळे एपीएमसी परिसरातील भाजीपाला, फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आठवडी बाजारात शेतमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकºयांनाही या पावसामुळे तोटा झाला. सप्टेंबर सरल्याने शेतकºयांच्या दृष्टीने हा अवकाळी पाऊसच समजला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस