शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:56 AM

जनतेमध्ये रोष : प्रशासनावर बेफिकीर कारभाराचा आरोप; दोन-दोन दिवस पाणी नाही

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसांनी होऊ लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांत कमालीचा संताप असून, याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या ‘पाणी’बाणीला महापालिका प्रशासनाचा बेफिकीर कारभार जबाबदार असल्याचा आरोप पनवेलकरांकडून होत आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल शहराला दिवसाला २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात केवळ १७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणीसुद्धा दिवसाआड देण्याचे धोरण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात दोन-दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनेक भागातील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने शहरात टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. रोहिदास वाडा, भुसार मोहल्ला, पटेल मोहल्ला, प्रभूआळी, परदेशीआळी, अशोका गार्डन, लोखंडीपाडा, सावरकर चौक आदी ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने कोणत्या वेळी पाणी येईल, याचा नेम नाही. त्यामुळे रहिवाशांना २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे शहरवासीयांना कायमस्वरूपी या पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण भागालाही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागाला दिवसाला २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी इतकेच पाणी दिले जात आहे. सिडको कार्यक्षेत्रातील वसाहतींनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात या पाणीसमस्येवरून येत्या काळात उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. नागरिकांच्या दूरध्वनीला प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि मंगळवारी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे मागील दोन दिवस पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठाही सलग नसल्याने या समस्येत भर पडली आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत दिला जाणारा पाणी भरण्याचा पॉइंट केवळ दोन इंच व्यासाचा आहे. त्यामुळे एक टँकर भरायला अर्धा ते एक तास लागत आहे. याचा परिणाम म्हणून दिवसभरात ५० टँकर भरणे शक्य होत नाही.- रामदास तायडे,पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महापालिकागाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी रॉयल्टी माफ करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला वेग प्राप्त होईल, तसेच पनवेल शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहोत.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा मलनि:सारण समितीपनवेल शहरात अशा प्रकारची भीषण समस्या कधीच उद्भवली नव्हती. सत्ताधाºयांच्या मार्फत याबाबतही राजकारण केले जात आहे. प्रशासनावर दबाव आणून टँकर आपल्या प्रभागात वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे पनवेलवासीयांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.- डॉ. सुरेखा मोहोकर,नगरसेविका,पनवेलटँकर लॉबीपनवेल शहरातील नागरिकांना नाईलाजास्तव टँकरने पाणी मागवावे लागत आहे. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे एका टँकरसाठी १५०० ते २५०० रुपयांची आकारणी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.५० टँकर पाण्याचे नियोजन नाहीपनवेलला नवी मुंबईत महापालिकेने दररोज ५० टँकर पाणी द्यायला सुरुवात केली आहे; परंतु पनवेल महापालिकेकडून या टँकरचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यातच पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नाहीत. त्यामुळे दरदिवशी ५० टँकर पाणी घेण्यास पनवेल महापालिका अपयशी ठरताना दिसत आहे.विहिरी पुनर्जीवित करण्याची गरजशहरात जवळपास २६ विहिरी आहेत. यापैकी अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या विहिरींची निगा राखल्यास त्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करता येईल.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड