शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

आदिवासी वाड्यांवर जलदुर्भिक्ष, पनवेलमधील १७ गावे, ३७ वाड्या टंचाईग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:58 IST

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

- मयूर तांबडेपनवेल : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आली असून, तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.पनवेल तालुक्यातील कुंबलटेकडी, ताडपट्टी, हौशाची वाडी, चिंचवाडी, गारमाळ, येरमाळ, भेकरे आदी गाव-वाड्या पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असून हजारो मीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यातच नद्या आटल्यामुळे काही गावातील आदिवासींना पाण्यासाठी डोंगरावरून खाली उतरून यावे लागते.पाण्यासाठी आदिवासी महिलांना मुलाबाळांसह उन्हातान्हात भटकावे लागते. लोकसभा निवडणुकीमुळे प्रत्येक पक्ष शहरात तसेच काही गावांमध्ये फिरून आपापल्या उमेदवाराचा गाजावाजा करून प्रचार करत होते. मात्र, पाण्याची समस्या सोडविण्यात कोणीही स्वारस्य दाखविले नाही.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठविण्यात आलेला आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १७ गाव तर ३७ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गारमाळ, बोंडरपाडा, सतीची वाडी, कुंबल टेकडी, चिंचवाडी, वाघाची वाडी, टावरवाडी आदी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गारमाळ व बोंडरपाडा गावातील आदिवासींना तर तीन ते साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर काही आदिवासी बांधवांना फार्महाउस मालक पाणी देत आहेत. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे, तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत.पनवेल तालुक्यातील देहरंग (गाढेश्वर) धरणातून पनवेल तसेच नवीन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, याच परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील हालटेप व ताडाचाटेप या दोन वाड्यांवर २३ एप्रिलपासून दिवसाआड शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आपटा ग्रामपंचायत येथील घेरावाडी, माड भवन, कोरळ वाडी येथे टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणीही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. डी. चव्हाण यांनी दिली.तर शिरवली, कोंडप, मोहोदर, कुत्तर पाडा या चार वाड्यांची पाहणी केलेली असून या ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीकडून तसा ठराव आला की त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. २०१९ मध्ये कानपोली, गुळसुंदे, सावळे, कसळखंड, नारपोली, धोदानी, मालडुंगे, नेरे, वाकडी ही नऊ गावे व गराडा, नेरेपाडा, कोरलवाडी या तीन वाड्यांतील विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली. यासाठी अंदाजे तीन लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत.तालुक्यातील अनेक ठिकाणच्या बोअरवेल व विहिरी बंद अवस्थेत आहेत, त्यांची दुरुस्ती केल्यास त्याचा वापर करता येणे शक्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.ज्या गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी बिडिओकडे ठराव येईल, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याची टंचाई आहे की नाही, याबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत.- आर. डी. चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई