शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आदिवासी वाड्यांवर जलदुर्भिक्ष, पनवेलमधील १७ गावे, ३७ वाड्या टंचाईग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:58 IST

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

- मयूर तांबडेपनवेल : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आली असून, तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.पनवेल तालुक्यातील कुंबलटेकडी, ताडपट्टी, हौशाची वाडी, चिंचवाडी, गारमाळ, येरमाळ, भेकरे आदी गाव-वाड्या पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असून हजारो मीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यातच नद्या आटल्यामुळे काही गावातील आदिवासींना पाण्यासाठी डोंगरावरून खाली उतरून यावे लागते.पाण्यासाठी आदिवासी महिलांना मुलाबाळांसह उन्हातान्हात भटकावे लागते. लोकसभा निवडणुकीमुळे प्रत्येक पक्ष शहरात तसेच काही गावांमध्ये फिरून आपापल्या उमेदवाराचा गाजावाजा करून प्रचार करत होते. मात्र, पाण्याची समस्या सोडविण्यात कोणीही स्वारस्य दाखविले नाही.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठविण्यात आलेला आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १७ गाव तर ३७ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गारमाळ, बोंडरपाडा, सतीची वाडी, कुंबल टेकडी, चिंचवाडी, वाघाची वाडी, टावरवाडी आदी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गारमाळ व बोंडरपाडा गावातील आदिवासींना तर तीन ते साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर काही आदिवासी बांधवांना फार्महाउस मालक पाणी देत आहेत. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे, तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत.पनवेल तालुक्यातील देहरंग (गाढेश्वर) धरणातून पनवेल तसेच नवीन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, याच परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील हालटेप व ताडाचाटेप या दोन वाड्यांवर २३ एप्रिलपासून दिवसाआड शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आपटा ग्रामपंचायत येथील घेरावाडी, माड भवन, कोरळ वाडी येथे टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणीही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. डी. चव्हाण यांनी दिली.तर शिरवली, कोंडप, मोहोदर, कुत्तर पाडा या चार वाड्यांची पाहणी केलेली असून या ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीकडून तसा ठराव आला की त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. २०१९ मध्ये कानपोली, गुळसुंदे, सावळे, कसळखंड, नारपोली, धोदानी, मालडुंगे, नेरे, वाकडी ही नऊ गावे व गराडा, नेरेपाडा, कोरलवाडी या तीन वाड्यांतील विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली. यासाठी अंदाजे तीन लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत.तालुक्यातील अनेक ठिकाणच्या बोअरवेल व विहिरी बंद अवस्थेत आहेत, त्यांची दुरुस्ती केल्यास त्याचा वापर करता येणे शक्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.ज्या गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी बिडिओकडे ठराव येईल, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याची टंचाई आहे की नाही, याबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत.- आर. डी. चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई