शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बारबालांविरोधात शिरवणे ग्रामस्थांनी सुरू केली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:05 AM

वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला.

नवी मुंबई : वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला. तसेच सद्यस्थितीला गावात राहणाऱ्या बारबालांना दोन महिन्यात घरे खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेल्या शिरवणे गावाची प्रतिमा सध्या मलीन होत चालली आहे. मागील दोन दशकांपासून गावात बारबालांची संख्या कमालीची वाढली आहे. गावात तसेच गावाभोवती झालेल्या गरजेपोटी बांधकामातील घरे भाड्याने देवून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले आहे. परंतु जास्त भाडे मिळावे याकरिता दलालांच्या आमिषाला बळी पडून बारबालांना देखील भाड्याने दिली जावू लागली आहेत. कालांतराने नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश बारमध्ये काम करणाºया बारबालांचे वास्तव्याचे ठिकाण शिरवणे गाव बनले आहे. शिरवणे ग्रामविकास मंडळ व ग्राम विकास युवा मंच यांनी एकत्रित येवून मागील काही दिवसात गावकीच्या तीन बैठका घेतल्या. त्यात गावामध्ये बारबालांचे वास्तव्य वाढल्याने होत असलेल्या परिणामाची माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक घेवून बारबाला हटाव मोहिमेचा ठराव करण्यात आला. त्यानुसार बैठकीनंतर संपूर्ण शिरवणे गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुुरुष, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक घर मालकाची भेट घेवून बारबालांना घर भाड्याने देवू नका असा संदेश दिला. सध्या राहत असलेल्या बारबालांना दोन महिन्यात घर खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.बारबालामुक्त शिरवणे गावासाठी झालेल्या बैठकीस नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, सुधागड पाली पंचायत समितीचे सभापती जितेंद्र म्हात्रे, नगरसेविका माधुरी सुतार, रोहिणी भोईर, परिवहन सदस्य श्रीकांत भोईर, दक्षता समितीच्या रमा जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील, ठाकूर भोईर, अनिल पाटील, जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर तसेच युवा मंचचे अध्यक्ष महेश पाटील, अविनाश सुतार, दिनेश ठाकूर, प्रमोद भोईर तसेच अमोल पाटील व सहकारी यांच्या प्रयत्नाने ही मोहीम सुरू झाली आहे.गावाच्या हितासाठी उभारलेल्या बारबाला हटाव मोहिमेला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेले शिरवणे गाव सध्या बारबालांचे गाव म्हणून ओळखले जावू लागले आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी ज्येष्ठ व तरुण एकत्रित मोहीम हाताळत आहेत. त्यात यश निश्चित असून पुढील काही दिवसात शिरवणेतून बारबालांचे अस्तित्व मिटलेले असेल.- प्रभाकर ठाकूर, खजिनदार, ग्रामविकास मंडळशिरवणे गावात पूर्णपणे बारबाला मुक्तीसाठी मोहीम उभारण्यात आली आहे. बारबालांच्या वाढत्या संख्येमुळे शिरवणे गावाची ओळख बारबालांचे गाव म्हणून होत चालल्याची खंत आहे. त्यांच्या नादी लागून तरुण मुले गैरमार्गाला जात आहेत. या तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट होवून मोहीम हाती घेण्यात आली आहे.- ठाकूर भोईर,उपाध्यक्ष, ग्रामविकास मंडळबारबालांच्या गैर कृत्यांचा परिणाम गावातील महिला व मुलींवर उमटत आहे. बारबालांच्या शोधात येणारे आंबटशौकिन गावातील सामान्य महिला व मुलींकडे देखील त्याच नजरेने पाहत आहेत. यामुळे वाद उद्भवत असून गावाची शांतता भंग होत चालली आहे. त्यामुळे घर मालकांमध्ये जनजागृती करून बारबालामुक्त शिरवणे गाव अभियान हाती घेतले आहे.- जयेंद्र सुतार,सचिव, ग्रामविकास मंडळबारबालांमुळे संपूर्ण शहरात शिरवणे गावाची प्रतिमा डागाळत चालली आहे. तरुणाई देखील वाममार्गाकडे वळत आहेत. या परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे उभारलेली मोहीम आज गावकीचा ठराव झालेली आहे. प्रत्येकालाच महिला, मुलींसह मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागल्याने बारबालांविरोधात मोहीम तीव्र झाली आहे.- अविनाश सुतार,कार्याध्यक्ष, युवा मंच

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई