शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

By नामदेव मोरे | Updated: June 27, 2023 08:52 IST

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मिरची, वाटाणा, फरसबी, घेवडा यांनी शंभरी ओलांडली आहे. टोमॅटोची आवकही राज्यात सर्वत्र कमी असून भाव वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो २५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक सोमवारी ६०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक  होत असते. मात्र, या सोमवारी पावसामुळे फक्त ५६७ वाहनांची नोंद झाली. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.  खराब झालेला माल फेकून द्यावा लागतो. किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या मालामध्येही १० ते २० टक्के खराब माल असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. 

मार्केटमध्ये २६५ टन टोमॅटोची आवक झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना खराब माल काढून टाकावा  लागत असून उरलेल्या मालाची विक्री करावी लागत असल्याने टोमॅटोचे दर किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये झाले आहेत.

हिरव्या मिरचीचा तुटवडाहिरव्या मिरचीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये मिरची ४० ते ५५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. वाटाणा १०० ते १२० रुपये, घेवडा १०० ते १२०, फरसबी १०० ते १२० रुपये किलो दराने किरकोळ मार्केटमध्ये विक्री होत आहे.

प्रमुख मार्केटमधील टोमॅटोचे प्रतिकिलो दरमार्केट    प्रतिकिलो दर पुणे    ३६ ते ५५औरंगाबाद    ५५ ते ६५श्रीरामपूर    २० ते ७०नागपूर    ४० ते ८०

 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईNavi Mumbaiनवी मुंबई