शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:06 AM

वर्षभरापूर्वी झाली मतदार नोंदणी : पदपथांवर वास्तव्य करणाऱ्यांकडेही शासकीय दस्तऐवज

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या वाढत असून, त्यामागे राजकीय स्वार्थ असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीत स्वतःचे पारडे जड करून घेण्यासाठी अनधिकृत झोपडीधारकांना शासकीय दस्तऐवज मिळवून दिले जात आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षांत शहरात झोपड्या उभारून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बोगस मतदारांची नोंदणी समोर येऊ लागली आहे. राजकीय व्यक्तींकडून बोगस मतदार नोंदणीसाठी अनधिकृत झोपड्यांमध्ये व पदपथांवर राहणाऱ्यांचा वापर केला जात आहे. तसे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर प्रभागातील मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांना आश्रय दिला जातो. त्यानंतर निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मतदार नोंदणीत त्यांचा मतदार म्हणून समावेश केला जात आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शिधापत्रिका, आधार कार्डदेखील मिळवून दिले जात आहे. यावरूनच अनेकांची वर्षानुवर्षे राजकीय गणिते ठरत आहेत. तर अशा झोपडपट्ट्यांच्या आधारावरच अनेक जण स्वतःच्या गळ्यात विजयाची माळा पाडून घेत आहेत. परंतु राजकीय स्वार्थासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘झोपड्यांचे शहर’ अशी नवी मुंबईची ओळख होऊ लागली आहे. सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर, पालिकेच्या राखीव भूखंडावर तसेच राखीव कांदळवनात या झोपड्यांना थारा मिळत आहे. मात्र निवासाचा कसलाही पुरावा नसतानाही त्यांना आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका व मतदान ओळखपत्र मिळतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून स्थानिक राजकारण्यांकडून संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत हेतू साध्य करून घेतला जात असल्याचे उघड दिसून येत आहे.

पामबीच मार्गावर वास्तव्य घणसोली येथे पामबीच मार्गाच्या प्रवेशावरच कांदळवनात झोपड्या बांधल्या आहेत. पूर्वी त्या ठिकाणी गॅरेज व नर्सरी चालवली जायची. मागील काही महिन्यांत तिथे निवासी वास्तव्य होऊ लागले आहे. तर त्यांची मतदानासाठी नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. 

लॉकडाऊनपूर्वी अनेकांची नोंदणीकोपर खैरणे येथील बालाजी थिएटरसमोर पदपथावर मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली आहे. परंतु गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी तिथल्या शेकडो जणांची मतदार नोंदणी झाली आहे. यावरून संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रशासनाचे अपयशशहर अतिक्रमणमुक्त ठेवणे हे महापालिकेसह सिडको व एमआयडीसी यांचीदेखील जबाबदारी आहे. यानंतरही मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारल्या जात असताना त्यावर कारवाईकडे चालढकल केली जाते. तर अनेकदा कारवाईचा दिखावा करून दुसऱ्याच दिवशी पुन्हा झोपड्या उभारण्याची मुभा दिली जाते. यानंतरही अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVotingमतदान