शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

By नामदेव मोरे | Updated: September 14, 2022 17:19 IST

Uday Samant : "वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे."

नवी मुंबई - महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले नाही. वेदांता प्रकल्पही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे - फडणवीस यांनी केले असे बोलण्याची वाईट सवय विरोधकांना लागली असल्याची टीकाही त्यांनी केली.

नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्यावेळी उदय सामंत बोलत होते. वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे. मागील आठ महिन्यात वेदांताचे व्यवस्थापन सरकारकडे हेलपाटे घालत होते. वीजेमध्ये सुट मिळावी, कर्नाटक, गुजरातच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हायपॉवर कमीटीची परवानगीही देण्यात आली नव्हती. यामुळे प्रकल्प इतर राज्यात गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की एखादा प्रकल्प ४० दिवसात परत जात नाही. यापुर्वीच्या सरकारच्या अनास्थेमुळेच तो प्रकल्प गेला असून भविष्यात त्यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये जर्मनीशी संबंधीत १ हजार पेक्षा जास्त उद्योग आहेत. जर्मन शिष्टमंडळ मागील अडीच वर्ष मविआ सरकाकडे वेळ मागत होते. परंतु त्यांना चर्चेसाठी वेळ देण्यात आला नाही. त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. आम्ही त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली असून लवकरच सविस्तर बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मागील सरकारने महाराष्ट्र पिछाडीवर नेला होता. आता पुन्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातील. आम्हाला भेटण्यासाठी एजंटची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, रमेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे