शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

By नामदेव मोरे | Updated: September 14, 2022 17:19 IST

Uday Samant : "वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे."

नवी मुंबई - महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले नाही. वेदांता प्रकल्पही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे - फडणवीस यांनी केले असे बोलण्याची वाईट सवय विरोधकांना लागली असल्याची टीकाही त्यांनी केली.

नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्यावेळी उदय सामंत बोलत होते. वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे. मागील आठ महिन्यात वेदांताचे व्यवस्थापन सरकारकडे हेलपाटे घालत होते. वीजेमध्ये सुट मिळावी, कर्नाटक, गुजरातच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हायपॉवर कमीटीची परवानगीही देण्यात आली नव्हती. यामुळे प्रकल्प इतर राज्यात गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की एखादा प्रकल्प ४० दिवसात परत जात नाही. यापुर्वीच्या सरकारच्या अनास्थेमुळेच तो प्रकल्प गेला असून भविष्यात त्यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये जर्मनीशी संबंधीत १ हजार पेक्षा जास्त उद्योग आहेत. जर्मन शिष्टमंडळ मागील अडीच वर्ष मविआ सरकाकडे वेळ मागत होते. परंतु त्यांना चर्चेसाठी वेळ देण्यात आला नाही. त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. आम्ही त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली असून लवकरच सविस्तर बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मागील सरकारने महाराष्ट्र पिछाडीवर नेला होता. आता पुन्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातील. आम्हाला भेटण्यासाठी एजंटची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, रमेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे