शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 1:21 AM

पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.

कळंबोली : मुंबई-उपनगरातून गावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसेसबरोबर खासगी बसेसनाही नागरिकांकडून प्रधान्य दिले जाते. वर्षभर प्रवास करण्यासाठी खासगी बसेसचा आधार घेतला जातो. कोरोनामुळे पाच महिन्यांपासून पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील १५० ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनलॉक टप्पा ४ मध्ये खासगी ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी राज्यातील, तसेच परराज्यातील नागरिक वास्तव्य करतात. पनवेल परिसरात १५०च्या जवळपास बुकिंग करणारे आॅफिस आहेत. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून खासगी बसेस बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद झाली आहेत. बसेस चालविण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालक, ड्रायव्हर, क्लीनरसह बुकिंग करणारेही संकटात सापडले आहेत. भाड्यामुळे आॅफिस बंद करण्याची वेळ आली असल्याचे ओम नम:शिवाय ट्रॅव्हल्स आॅफिसचे मालक बालाजी गुरमे यांनी सांगितले. एक सीट बुकिंग केल्यास ३० ते ५० रुपये मिळतात. दिवसभरात १५ ते २० सीटची बुकिंग होते. त्यातून आॅफिस खर्च, कामगार यांचा पगार दिला जात असल्याचे गुरमे म्हणाले. सुट्टीच्या काळात जास्त बुकिंग केली जाते. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. शासनाची खासगी लक्झरी बसेसला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे आॅफिस बंद आहेत . पाच महिन्याचे गाळे भाडे थकले आहेत. तेही देणे कठिण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रॅव्हल्स सुरू झाले तर दिलासा मिळेल.- विनोद पवार,नॅशनल ट्रॅव्हल्स, पनवेलआमचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्स बुकींवर आहे. गेली १२ वर्षांपासून हे काम करतोय. पहिल्यांदा कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने महामंडळ बसेस सुरू केल्या आहेत, तसे ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश रानमारे,अनिकेत ट्रॅव्हल्स सिबीडी बेलापूरकोरोनाच्या काळात मालकाने अर्धे भाडे माफ केले आहे. पाच महिन्यांचे अर्धे तरी भाडे द्यावेच लागणार आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. लवकर ट्रॅव्हल्स चालू करण्यास परवानगी दिली, तर आमचाही व्यवसाय सुरू होईल.आॅफिस बंद असल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे. कुटुंब सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, हीच माफक मागणी आहे .- हर्षल भोसले,श्री गणेश ट्रॅव्हल्स,कामोठे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई