शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ट्रायच्या नव्या धोरणात ग्राहकांसह केबलचालकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 03:55 IST

केबलसेनेचा आंदोलनाचा इशारा : कमी पैसे हा केवळ आभास

अजित मांडके 

ठाणे : नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल पाहण्याची आणि जेवढे चॅनल पाहतो, त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु, हा केवळ आभास असून यामध्ये ग्राहक आणि केबलचालकांचे कंबरडे मोडणार असल्याचा आरोप ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. ट्रायच्या या नव्या धोरणानुसार केबल आॅपरेटरला केवळ १० टक्केच नफा मिळणार असून आलेल्या उत्पन्नातून कामगारांचे पगार, तांत्रिक दुरुस्तीची कामे करणे अवघड होणार आहे. शिवाय, ग्राहकांना कमी खर्चात चॅनल मिळणार असल्याचे बोलले जात असले तरीसुद्धा बेसिक चॅनलसाठीच ग्राहकांच्या खिशाला ४५० रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायने याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा नव्या वर्षात सर्वच केबल आॅपरेटर आंदोलन करतील, असा इशाराही केबलसेनेने दिला.

येत्या १ जानेवारीपासून ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या बघण्याची संधी मिळणार आहे. सध्या ठाणे किंवा इतर ठिकाणांचा विचार केल्यास या भागांमध्ये केबल आॅपरेटर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. केवळ ठाण्यातच ३५० च्या आसपास केबल आॅपरेटर असून त्यामध्ये एक हजारांच्या आसपास कामगार काम करत आहेत. ठाण्यात केबल ग्राहकांचे दोन लाखांच्या आसपास जाळे पसरले आहे. त्यामुळे या दोन लाख ग्राहकांना या नव्या धोरणाचा फायदा होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु, या नव्या धोरणानुसार केवळ ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रयत्न असल्याचा दावा ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. या नव्या धोरणानुसार प्रत्येक ग्राहकाला फ्री टू एअर चॅनल घेतल्यावरच पॅकेजमधील चॅनल पाहण्याची संधी मिळणार आहे. परंतु, यासाठी १३० रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत. जे काही पॅकेज निवडले जाईल, त्यासाठी पुन्हा २५० रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागणार आहेत.नवे धोरण ग्राहकांना नुकसानकारकसध्या कोणतेही पॅकेज नसताना सर्व चॅनलसाठी ग्राहकांना ३०० पासून ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, आता नव्या धोरणानुसार जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असून केबल आॅपरेटरचेही नुकसान असल्याचे मत सेनेने व्यक्त केले आहे. केबल आॅपरेटरला यामधून केवळ १० टक्केच कमिशन मिळणार आहे, तर फ्री टू एअर वाहिन्यांमधून ५० टक्के कमिशन मिळणार आहे. परंतु, ते कमिशन असून नसल्यासारखेच असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. कारण, जे १० टक्के कमिशन मिळणार आहे, त्यातून कामगारांचे पगार द्यायचे, तांत्रिक दुरुस्तीची कामे करायची, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याचा खर्च भागवायचा कसा, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.चारच दिवसांपूर्वी ट्रायच्या सदस्यांसमवेत ठाण्यातील केबल आॅपरेटरची चर्चा झालेली आहे. या चर्चेत आम्ही समस्या ठेवल्या आहेत. कमीतकमी ४० टक्के कमिशन मिळावे, अशी मागणी केली आहे. परंतु, यावर योग्य तो तोडगा निघाला नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.- मंगेश वाळुंज,अध्यक्ष, ठाणे जिल्हा केबलसेनाट्रायच्या नव्या धोरणांमुळे केबल चार्जेसमध्ये होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकाच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. करमणूक शुल्क तर घेतले जातेच. आता त्यावर जीएसटीही आकारला जाणार आहे. ग्राहकाला मोफत तर नाहीच, मात्र परवडेल अशा किमतीतही आता काही मिळत नाही.- गणेश जोशी, राष्टÑीय अध्यक्ष,ग्राहक संरक्षण सेवा समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई