शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ट्रायच्या नव्या धोरणात ग्राहकांसह केबलचालकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 03:55 IST

केबलसेनेचा आंदोलनाचा इशारा : कमी पैसे हा केवळ आभास

अजित मांडके 

ठाणे : नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल पाहण्याची आणि जेवढे चॅनल पाहतो, त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु, हा केवळ आभास असून यामध्ये ग्राहक आणि केबलचालकांचे कंबरडे मोडणार असल्याचा आरोप ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. ट्रायच्या या नव्या धोरणानुसार केबल आॅपरेटरला केवळ १० टक्केच नफा मिळणार असून आलेल्या उत्पन्नातून कामगारांचे पगार, तांत्रिक दुरुस्तीची कामे करणे अवघड होणार आहे. शिवाय, ग्राहकांना कमी खर्चात चॅनल मिळणार असल्याचे बोलले जात असले तरीसुद्धा बेसिक चॅनलसाठीच ग्राहकांच्या खिशाला ४५० रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायने याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा नव्या वर्षात सर्वच केबल आॅपरेटर आंदोलन करतील, असा इशाराही केबलसेनेने दिला.

येत्या १ जानेवारीपासून ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या बघण्याची संधी मिळणार आहे. सध्या ठाणे किंवा इतर ठिकाणांचा विचार केल्यास या भागांमध्ये केबल आॅपरेटर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. केवळ ठाण्यातच ३५० च्या आसपास केबल आॅपरेटर असून त्यामध्ये एक हजारांच्या आसपास कामगार काम करत आहेत. ठाण्यात केबल ग्राहकांचे दोन लाखांच्या आसपास जाळे पसरले आहे. त्यामुळे या दोन लाख ग्राहकांना या नव्या धोरणाचा फायदा होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु, या नव्या धोरणानुसार केवळ ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रयत्न असल्याचा दावा ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. या नव्या धोरणानुसार प्रत्येक ग्राहकाला फ्री टू एअर चॅनल घेतल्यावरच पॅकेजमधील चॅनल पाहण्याची संधी मिळणार आहे. परंतु, यासाठी १३० रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत. जे काही पॅकेज निवडले जाईल, त्यासाठी पुन्हा २५० रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागणार आहेत.नवे धोरण ग्राहकांना नुकसानकारकसध्या कोणतेही पॅकेज नसताना सर्व चॅनलसाठी ग्राहकांना ३०० पासून ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, आता नव्या धोरणानुसार जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असून केबल आॅपरेटरचेही नुकसान असल्याचे मत सेनेने व्यक्त केले आहे. केबल आॅपरेटरला यामधून केवळ १० टक्केच कमिशन मिळणार आहे, तर फ्री टू एअर वाहिन्यांमधून ५० टक्के कमिशन मिळणार आहे. परंतु, ते कमिशन असून नसल्यासारखेच असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. कारण, जे १० टक्के कमिशन मिळणार आहे, त्यातून कामगारांचे पगार द्यायचे, तांत्रिक दुरुस्तीची कामे करायची, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याचा खर्च भागवायचा कसा, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.चारच दिवसांपूर्वी ट्रायच्या सदस्यांसमवेत ठाण्यातील केबल आॅपरेटरची चर्चा झालेली आहे. या चर्चेत आम्ही समस्या ठेवल्या आहेत. कमीतकमी ४० टक्के कमिशन मिळावे, अशी मागणी केली आहे. परंतु, यावर योग्य तो तोडगा निघाला नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.- मंगेश वाळुंज,अध्यक्ष, ठाणे जिल्हा केबलसेनाट्रायच्या नव्या धोरणांमुळे केबल चार्जेसमध्ये होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकाच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. करमणूक शुल्क तर घेतले जातेच. आता त्यावर जीएसटीही आकारला जाणार आहे. ग्राहकाला मोफत तर नाहीच, मात्र परवडेल अशा किमतीतही आता काही मिळत नाही.- गणेश जोशी, राष्टÑीय अध्यक्ष,ग्राहक संरक्षण सेवा समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई