शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलव्हॅनमधील वाहतूक असुरक्षित, व्हॅनचालकांकडून नियमांची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:54 IST

पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॅनला आग लागण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. अनेक चालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याविषयी आरटीओकडून कडक कारवाई होत नसल्याने विद्यार्थी वाहतूक असुरक्षित बनू लागली आहे.पनवेल परिसरात डीएव्ही, महात्मा, न्यू हॉरिझोन, कारमेल, सेंट जोसेफ, रायन, बालभारती, ग्रीन फिंगर्स, यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शाळा आहेत. लाखो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. काही ठिकाणी स्कूलबसची व्यवस्था आहे; परंतु अरुंद रस्ते, गल्यांमध्ये स्कूलबस जात नाहीत.सिडको वसाहतींत जास्त शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कूलव्हॅनद्वारे शाळेत ने-आण केली जाते. स्कूलव्हॅन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात फारसे प्रबोधन नसते. अनेक वाहनचालकांच्या स्टेरिंगलगत तंबाखूच्या पुड्यादिसून येतात, त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.व्हॅनमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सीटबेल्ट लावला जात नाही, तसेच वाहनचालकही सीटबेल्ट लावत नाहीत. चालक मोबाइलवर बोलत व्हॅन चालविताना दिसतात. तर काही जण हेडफोन लावून गाणी ऐकण्यात दंग असतात. यावरून चालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलव्हॅन चालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, या दृष्टिकोनातून परिवहन विभागाची नजर असते. यासाठी खास पथकही नेमण्यात आले असून, नियमित कारवाईही केली जाते. त्याचबरोबर व्हॅनचालकांमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेलक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूकस्कूलव्हॅनमध्ये नियमानुसार सात अधिक एक, अशी आठ विद्यार्थ्यांची वाहतूक करणे अपेक्षित आहे; परंतु १२ ते १५ विद्यार्थ्यांची एकाच वेळी वाहतूक व्हॅनमधून केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे विद्यार्थी वाहतूक धोकादायक आहे. याबाबत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.पासिंगनंतर स्पीड गव्हर्नर काढण्याचे प्रकारवेगमर्यादेकरिता परिवहन विभागाने सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती केली आहे. ती यंत्रणा बसवल्याशिवाय वाहनांची पासिंग केली जात नाही. स्कूलव्हॅनला अशाप्रकारे स्पीड गव्हर्नर बसवण्यात येतात. मात्र, पासिंग झाल्यानंतर चालक ती काढून टाकतात. त्यामुळे अनेकदा वेगमर्यादा ओलांडली जाते. कित्येकदा यामुळे अपघातसुद्धा करतात, तर वाहनांना कट मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाTrafficवाहतूक कोंडी