शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलव्हॅनमधील वाहतूक असुरक्षित, व्हॅनचालकांकडून नियमांची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:54 IST

पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॅनला आग लागण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. अनेक चालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याविषयी आरटीओकडून कडक कारवाई होत नसल्याने विद्यार्थी वाहतूक असुरक्षित बनू लागली आहे.पनवेल परिसरात डीएव्ही, महात्मा, न्यू हॉरिझोन, कारमेल, सेंट जोसेफ, रायन, बालभारती, ग्रीन फिंगर्स, यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शाळा आहेत. लाखो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. काही ठिकाणी स्कूलबसची व्यवस्था आहे; परंतु अरुंद रस्ते, गल्यांमध्ये स्कूलबस जात नाहीत.सिडको वसाहतींत जास्त शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कूलव्हॅनद्वारे शाळेत ने-आण केली जाते. स्कूलव्हॅन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात फारसे प्रबोधन नसते. अनेक वाहनचालकांच्या स्टेरिंगलगत तंबाखूच्या पुड्यादिसून येतात, त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.व्हॅनमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सीटबेल्ट लावला जात नाही, तसेच वाहनचालकही सीटबेल्ट लावत नाहीत. चालक मोबाइलवर बोलत व्हॅन चालविताना दिसतात. तर काही जण हेडफोन लावून गाणी ऐकण्यात दंग असतात. यावरून चालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलव्हॅन चालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, या दृष्टिकोनातून परिवहन विभागाची नजर असते. यासाठी खास पथकही नेमण्यात आले असून, नियमित कारवाईही केली जाते. त्याचबरोबर व्हॅनचालकांमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेलक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूकस्कूलव्हॅनमध्ये नियमानुसार सात अधिक एक, अशी आठ विद्यार्थ्यांची वाहतूक करणे अपेक्षित आहे; परंतु १२ ते १५ विद्यार्थ्यांची एकाच वेळी वाहतूक व्हॅनमधून केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे विद्यार्थी वाहतूक धोकादायक आहे. याबाबत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.पासिंगनंतर स्पीड गव्हर्नर काढण्याचे प्रकारवेगमर्यादेकरिता परिवहन विभागाने सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती केली आहे. ती यंत्रणा बसवल्याशिवाय वाहनांची पासिंग केली जात नाही. स्कूलव्हॅनला अशाप्रकारे स्पीड गव्हर्नर बसवण्यात येतात. मात्र, पासिंग झाल्यानंतर चालक ती काढून टाकतात. त्यामुळे अनेकदा वेगमर्यादा ओलांडली जाते. कित्येकदा यामुळे अपघातसुद्धा करतात, तर वाहनांना कट मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाTrafficवाहतूक कोंडी