शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

स्कूलव्हॅनमधील वाहतूक असुरक्षित, व्हॅनचालकांकडून नियमांची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:54 IST

पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॅनला आग लागण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. अनेक चालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याविषयी आरटीओकडून कडक कारवाई होत नसल्याने विद्यार्थी वाहतूक असुरक्षित बनू लागली आहे.पनवेल परिसरात डीएव्ही, महात्मा, न्यू हॉरिझोन, कारमेल, सेंट जोसेफ, रायन, बालभारती, ग्रीन फिंगर्स, यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शाळा आहेत. लाखो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. काही ठिकाणी स्कूलबसची व्यवस्था आहे; परंतु अरुंद रस्ते, गल्यांमध्ये स्कूलबस जात नाहीत.सिडको वसाहतींत जास्त शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कूलव्हॅनद्वारे शाळेत ने-आण केली जाते. स्कूलव्हॅन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात फारसे प्रबोधन नसते. अनेक वाहनचालकांच्या स्टेरिंगलगत तंबाखूच्या पुड्यादिसून येतात, त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.व्हॅनमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सीटबेल्ट लावला जात नाही, तसेच वाहनचालकही सीटबेल्ट लावत नाहीत. चालक मोबाइलवर बोलत व्हॅन चालविताना दिसतात. तर काही जण हेडफोन लावून गाणी ऐकण्यात दंग असतात. यावरून चालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलव्हॅन चालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, या दृष्टिकोनातून परिवहन विभागाची नजर असते. यासाठी खास पथकही नेमण्यात आले असून, नियमित कारवाईही केली जाते. त्याचबरोबर व्हॅनचालकांमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेलक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूकस्कूलव्हॅनमध्ये नियमानुसार सात अधिक एक, अशी आठ विद्यार्थ्यांची वाहतूक करणे अपेक्षित आहे; परंतु १२ ते १५ विद्यार्थ्यांची एकाच वेळी वाहतूक व्हॅनमधून केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे विद्यार्थी वाहतूक धोकादायक आहे. याबाबत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.पासिंगनंतर स्पीड गव्हर्नर काढण्याचे प्रकारवेगमर्यादेकरिता परिवहन विभागाने सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती केली आहे. ती यंत्रणा बसवल्याशिवाय वाहनांची पासिंग केली जात नाही. स्कूलव्हॅनला अशाप्रकारे स्पीड गव्हर्नर बसवण्यात येतात. मात्र, पासिंग झाल्यानंतर चालक ती काढून टाकतात. त्यामुळे अनेकदा वेगमर्यादा ओलांडली जाते. कित्येकदा यामुळे अपघातसुद्धा करतात, तर वाहनांना कट मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाTrafficवाहतूक कोंडी