शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:27 IST

संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल परिसरात मागील तीन दिवसांपासून बरसलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत केले आहे. संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.सोमवारी पावसाचा जोर कायम होता. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त सरासरी पावसाची नोंद पनवेल तालुक्यात झाली आहे. तालुक्यात सोमवारी २०७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी पनवेल तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान झाले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात मोठ्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पालिका क्षेत्रातील सिद्धी करवले गावात वीजपुरवठा मागील दोन दिवसापासून खंडित झाला आहे. महावितरणने बसविलेले विद्युत खांब अतिवृष्टीमुळे कोसळल्याने ग्रामस्थांना दोन दिवस अंधारात घालवावे लागले. पनवेल शहरातील एचओसी आदिवासी वाडीत देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या या आदिवासी वाडीत साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी केवळ एकच पंप याठिकाणी कार्यान्वित होता. पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या समोरच ही आदिवासी वाडी आहे. या परिसरात करण्यात आलेल्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. पनवेल महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र मुख्यालयाजवळील अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यास पालिकेला अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे. पालिकेच्या मालकीची बोट नसल्याने आपत्कालीन परिस्थितीवर नवी मुंबई महानगरपालिकेकडे किंवा सिडकोची मदत पालिकेला घ्यावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पालिकेच्या मार्फत प्रभागनिहाय आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र या केंद्रांमध्ये आवश्यक सामुग्री उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची धुरा आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदी ठिकाणी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. तर मुख्य केंद्र पनवेल अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहेत. सध्याच्या घडीला पनवेल महानगर पालिकेत नोकरभरती झाली नसल्याने अपुरा मनुष्यबळाचा फटका पालिका कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवरच आपत्ती व्यवस्थापनाचा भार आहे.प्रभागनिहाय पालिकेची आपत्ती व्यवस्थापन केंद्रेखारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदींसह पनवेल अग्निशमन केंद्रात मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रे कार्यान्वित आहे. याकरिता ०२२२७४५८०४० /४१/४२ या क्रमांकाची हेल्पलाइन पालिकेने सुरु केली आहे.तहसील कार्यालयाचे इतर प्राधिकरणाशी समन्वयपनवेल महानगर पालिका क्षेत्र वगळता पनवेल तहसील कार्यालयामार्फत देखील आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत आहे.तहसीलदार अमित सानप हे याकरिता स्वत: इतर प्राधिकरणाशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आवश्यकता भासल्यास सिडको, महानगर पालिका, एमआयडीसी आदी प्राधिकरणाची मदत घेत असल्याचे तहसीलदार सानप यांनी सांगितले.

टॅग्स :panvelपनवेल