शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 17:41 IST

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.या मोर्चात हजारो ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे. त्यानंतरच संतप्त झालेले मोर्चेकरी माघारी परतले आहेत. चाणजे ग्रामपंचायत उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सातही पाड्यांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणी टंचाई दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.मात्र या विविध योजनांच्या पुर्ततेनंतरही हजारो ग्रामस्थांच्या नळांना पाण्याऐवजी फक्त हवाच येत आहे.

काही ठिकाणी फक्त २० दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे.तेही गरजे इतकेही मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यातच पाणी टंचाई भीषण झाली आहे.चाणजे ग्रामपंचायतीला १० लाख लिटर पाणी कोटा मंजूर आहे.तरीही एमआयडीसीकडून दररोज ११ लाख लीटर असा ज्यादा पाणी पुरवठा केला जात असल्याचे  एमआयडीसीकडून सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त सिडकोकडून हेटवणे धरणातुनही काही पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.वापरासाठी बोअरवेल खोदल्या आहेत.इतके पाणी पुरवठा करण्याचे स्त्रोत असताना पाणी जाते कुठे यासाठी ग्रामस्थांनीच शोध घेण्यासाठी पुढाकार घेऊन पाणी टंचाईची कारणे ग्रामस्थांनी शोधून काढली आहेत.या शोध मोहीमेत मागील अनेक वर्षांपासून चाणजे ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनीच हद्दीतील सुमारे ६०० इमारतींना अवैध नळ कनेक्शन दिली आहेत.

धनदांडगे थेट मुख्य जलवाहिन्यांनाच विद्युत पंप लाऊन राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी करीत आहेत.पाणी पुरवठ्याच्या नियोजनातही ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे.ग्रामपंचायत बिल्डर, धनदांडगे यांच्यातील थेट साटेलोट्यांमुळेच सामान नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नसल्याचे दिसून आल्यानंतर संतप्त झालेल्या करंजा सातपाड्यांनी ग्रामस्थांनी मागील आठ दिवस जनजागृती करीत पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच मोर्चा काढण्याचा निर्धार पक्का केला होता. त्यानुसार राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.उरण चारफाटा येथुन उरण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कामगार नेते भूषण पाटील, सातपाड्यांतील गाव अध्यक्ष मनोहर कोळी, संतोष पवार, सिताराम नाखवा आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी तर हंडे वाजवून शासकीय यंत्रणेचा धिक्कार केला.तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनेक वक्त्यांनी पाणी टंचाईसाठी जबाबदार असलेल्या शासकीय, प्रशासकीय, राज्यकर्त्यांचा शाब्दिक कोट्या करून चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.याप्रसंगी उरण एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी,उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत, सिडको अधिकारी ॠषी नाईक व शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत शिष्टमंडळाने चाणजे ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार उघडकीस आणला.त्यानंतर इमारती, बिल्डर, धनदांडगे व इतरांना दिलेल्या अवैध, अनधिकृत दिलेल्या नळ जोडण्या तोडण्याचे तसेच बेकायदेशीर सुरू असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी चाणजे ग्रामपंचायतींला दिल्या आहेत.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर जल जीवन मिशन योजने अंतर्गत १० कोटी खर्चाच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत यांनी दिली.सिडको अधिकाऱ्यांनीही हेटवणे धरणातुन करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात आणखी वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.शासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतरच मोर्चेकऱ्यांनी तुर्तास माघार घेतली असल्याचे भूषण पाटील, मनोहर कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई