शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 17:41 IST

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.या मोर्चात हजारो ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे. त्यानंतरच संतप्त झालेले मोर्चेकरी माघारी परतले आहेत. चाणजे ग्रामपंचायत उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सातही पाड्यांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणी टंचाई दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.मात्र या विविध योजनांच्या पुर्ततेनंतरही हजारो ग्रामस्थांच्या नळांना पाण्याऐवजी फक्त हवाच येत आहे.

काही ठिकाणी फक्त २० दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे.तेही गरजे इतकेही मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यातच पाणी टंचाई भीषण झाली आहे.चाणजे ग्रामपंचायतीला १० लाख लिटर पाणी कोटा मंजूर आहे.तरीही एमआयडीसीकडून दररोज ११ लाख लीटर असा ज्यादा पाणी पुरवठा केला जात असल्याचे  एमआयडीसीकडून सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त सिडकोकडून हेटवणे धरणातुनही काही पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.वापरासाठी बोअरवेल खोदल्या आहेत.इतके पाणी पुरवठा करण्याचे स्त्रोत असताना पाणी जाते कुठे यासाठी ग्रामस्थांनीच शोध घेण्यासाठी पुढाकार घेऊन पाणी टंचाईची कारणे ग्रामस्थांनी शोधून काढली आहेत.या शोध मोहीमेत मागील अनेक वर्षांपासून चाणजे ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनीच हद्दीतील सुमारे ६०० इमारतींना अवैध नळ कनेक्शन दिली आहेत.

धनदांडगे थेट मुख्य जलवाहिन्यांनाच विद्युत पंप लाऊन राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी करीत आहेत.पाणी पुरवठ्याच्या नियोजनातही ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे.ग्रामपंचायत बिल्डर, धनदांडगे यांच्यातील थेट साटेलोट्यांमुळेच सामान नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नसल्याचे दिसून आल्यानंतर संतप्त झालेल्या करंजा सातपाड्यांनी ग्रामस्थांनी मागील आठ दिवस जनजागृती करीत पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच मोर्चा काढण्याचा निर्धार पक्का केला होता. त्यानुसार राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.उरण चारफाटा येथुन उरण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कामगार नेते भूषण पाटील, सातपाड्यांतील गाव अध्यक्ष मनोहर कोळी, संतोष पवार, सिताराम नाखवा आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी तर हंडे वाजवून शासकीय यंत्रणेचा धिक्कार केला.तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनेक वक्त्यांनी पाणी टंचाईसाठी जबाबदार असलेल्या शासकीय, प्रशासकीय, राज्यकर्त्यांचा शाब्दिक कोट्या करून चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.याप्रसंगी उरण एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी,उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत, सिडको अधिकारी ॠषी नाईक व शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत शिष्टमंडळाने चाणजे ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार उघडकीस आणला.त्यानंतर इमारती, बिल्डर, धनदांडगे व इतरांना दिलेल्या अवैध, अनधिकृत दिलेल्या नळ जोडण्या तोडण्याचे तसेच बेकायदेशीर सुरू असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी चाणजे ग्रामपंचायतींला दिल्या आहेत.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर जल जीवन मिशन योजने अंतर्गत १० कोटी खर्चाच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत यांनी दिली.सिडको अधिकाऱ्यांनीही हेटवणे धरणातुन करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात आणखी वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.शासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतरच मोर्चेकऱ्यांनी तुर्तास माघार घेतली असल्याचे भूषण पाटील, मनोहर कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई