शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम 
2
इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती
3
जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान
4
पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली
5
NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती
6
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : आम्ही भारतीय सर्वत्र आहोत, आम्ही जगावर राज्य करतो! हार्दिक पांड्याच्या विधानाची चर्चा 
7
देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!
8
केंद्रात पुन्हा मोदी सरकार; नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली
9
"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 
10
तबेल्यात दफन लेकीचा मृतदेह, वडिलांना माहिती असूनही गप्प; १ महिन्यानं उलगडलं रहस्य
11
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 
12
मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...
13
केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
14
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
15
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
16
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
17
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
18
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
19
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
20
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 9:35 PM

तिकीटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त : मोरा बंदरात प्रवासी बोट चिखलात रुतून बसल्यामुळे भाविकांचे हाल

मधुकर ठाकूर/ उरण :  महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.संध्याकाळी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवुन दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकीट ऐवजी बोट चालकांकडून ७०-८० वसुल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही आणखीनच कमी झाली आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र हजारो शिवभक्तांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात वाढ केली जात असल्याने बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली आहे.याबाबत खंत आणि चिंता व्यक्त करून भाविकांना कमी खर्चात दर्शन घडविण्यासाठी यावर्षी तिकिट दर कमी करण्याची  विनंती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रादेशिक बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.

  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून तिकिट दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करता यावर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट तिकीट दर ठरवून दिला होता.मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही  बोट चालकांकडून एकेरीसाठी ७०-८० तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते.त्याशिवाय तिकिटही दिले जात नव्हते.बोटचालकांच्या मनमानी तिकीट दर वसुलीमुळे मात्र महाशिवरात्री निमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.तिकिट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालक बंदर, पोलिस व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगत मनमानीपणे पैसे वसूल करीत होते.मात्र बोट चालकांचा मनमानी कारभार आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांबद्दल भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 महाशिवरात्री निमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.मात्र राजबंदर जेट्टीवरुन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भाविकांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.राजबंदर जेट्टीवर संध्याकाळी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण- मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरुन दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.या गोंधळामुळे जेएनपीटीकडे जाणारे भाविक मोरा बोटीत तर मोरा बंदराकडे जाणारे भाविक जेएनपीटीच्या बोटीत अडकून पडल्याने महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले.

हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने बंदर अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात भाविकांना सोडण्यासाठी निघालेल्या काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या होत्या.मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यत पोहचल्या खऱ्या. मात्र  बंदरात पुरेश्या प्रमाणात पाणी नसल्याने मात्र मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी मोठ्या शेकडो भाविकांसह बोट चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागली.प्रशासनाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत मात्र  शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई