शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराला मिळेल गती; सिडकोला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 04:42 IST

विमानतळ प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई : गणेशोत्सवानंतर विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराला गती मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. यात ग्रामस्थांनी स्थलांतराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या दहा गावांतील ३००० कुटुंबे पर्यायी जागेवर स्थलांतरित होणार आहेत. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांनी सिडकोच्या वतीने भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहेत. त्यानंतरही काही मागण्यांवर ग्रामस्थ ठाम आहेत. त्याचा परिणाम म्हणून स्थलांतरणाच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. स्थलांतरासाठी ७ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत केवळ १७०० ग्रामस्थांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित १३०० ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरण करून आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीत सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ग्रामस्थांबरोबर पुन्हा बैठक घेऊन गणेशोत्सवानंतर स्थलांतरण करण्याचे आवाहन केले.दहा गावांपैकी पाच गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतराला प्रतिसाद मिळत आहे; परंतु उर्वरित पाच गावांतील ग्रामस्थ काही मागण्यांवर अडून बसले आहेत; परंतु त्यांच्याबरोबर समाधानकारक चर्चा झाली असून, गणेशोत्सवानंतर स्थलांतराच्या प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.पुनर्वसनाच्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शाळा, हॉस्पिटल्स, तसेच पाणी या अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सुविधा द्या, मगच स्थलांतर करू, असा पवित्रा वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वरचा ओवळा हे गाव धावपट्टीच्या मुख्य गाभा क्षेत्रात असल्याने सर्वप्रथम या गावाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानंतर येथील ग्रामस्थ नक्कीच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोला वाटत आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको