ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्याच सुटणार!

By Admin | Updated: October 12, 2016 04:59 IST2016-10-12T04:59:40+5:302016-10-12T04:59:40+5:30

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दहा दिवसाचा काळावधी लोटला आहे. पालिकेमध्ये २९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था

There will be problem in garbage in rural areas | ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्याच सुटणार!

ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्याच सुटणार!

वैभव गायकर / पनवेल
पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दहा दिवसाचा काळावधी लोटला आहे. पालिकेमध्ये २९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. ग्रामपंचायतीमार्फत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र्य यंत्रनेद्वारे कचरा जमा करून विल्हेवाट लावली जात होती. मात्र ग्रामपंचायती बरखास्त केल्यानंतर संबंधी यंत्रणा काही प्रमाणात कोलमडली आहे.
पनवेल शहर महानगरपालिकेत खारघर, कामोठे, तळोजा, रोडपाली सारख्या महत्वाच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचा कारभार महानगरपलिकच्या हाती गेल्याने ग्रामीण भागातील कचऱ्याची विल्हेवाट महानगरपालिका लावणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या घंटा गाड्यासह सर्वच प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या गाड्या महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. मात्र काही गाड्या जागेवरच उभ्या असल्याने कचऱ्याचा प्रश्न उद्भवू शकतो. महापालिका या गावातील कचऱ्यांच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात नियोजन आखत असल्याचे महापालिकेचे उपायुक्तांचे म्हणणे आहे. कचरा एकाच ठिकाणी डम्प करण्याचे नियोजन सुरु असल्याचे पालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. याकरिता सहा गावामागे एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून कचरा वर्गीकरण व नियोजनाची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर असेल.

Web Title: There will be problem in garbage in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.