शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 2:39 AM

रायगडातील आरोग्यविषयक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन यंत्रणा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती.

अरूणकुमार मेहेत्रे कळंबोली : रायगडातील आरोग्यविषयक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन यंत्रणा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र, ती हवेतच विरली आहे. अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळण्यास विलंब होत आहे.रायगड जिल्हा विस्ताराने मोठा असून, एकूण १५ तालुके आहेत. पनवेलचा अपवाद वगळता इतर तालुके ग्रामीणबहूल आहेत. ग्रामीण भाग जास्त असल्याने या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. याकरिता शहरी भागातील दवाखाने गाठावे लागतात. अनेकदा मुंबईही रुग्णांना गाठावी लागत असल्याने पैसा, वेळ खर्ची पडतो. ग्रामीण भागात आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा दिली जाते; परंतु त्यामध्ये अनेक मर्यादा येतात त्याचबरोबर तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला मिळत नाही. त्याकरिता शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा कल सध्या आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून रायगड जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीन यंत्रणा सुरू करण्याच्या घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने रायगडातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याकरिता टेलिमेडिसीनची सोय करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. दूरस्थ भागातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे प्रगत माहिती तंत्रज्ञान दूरसंचार यंत्रणा म्हणजे टेलिमेडिसीन होय.दूरध्वनी व इंटरनेट यासारख्या माध्यमांचा वापर करून आरोग्य केंद्रातून रोगनिदान तंत्र केंद्र यांच्याशी संपर्क साधून रु ग्णांना अतिजलद व गुणवत्ताप्रधान आरोग्यसेवा पुरविण्यात येते. उपचारांसाठी टेलिमेडिसीन ही उपकारक अशी उपचारपद्धती आहे. आरोग्यसेवेची सहज उपलब्धता व जलद सेवापुरवठा याकरिता ही उपयोगी पद्धती असल्याचा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात अलिबाग आणि माणगाव वगळता इतर ठिकाणी ही सुविधा सुरू झाली नाही. आरोग्य विभागाकडून उदासीनता दिसून येत आहे.>आरोग्य केंद्र ठरणार आरोग्यवर्धकरायगड जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. विविध आजाराबाबत टेलिमेडिसीनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ले घेता येतील. त्यानुसार औषधोपचारसुद्धा करता येणार आहे. याकरिता ही यंत्रणा बसविली तर शहरात जाण्याची गरज भासणार नाही किंवा खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. संबंधित यंत्रणांमुळे गरीब गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करता येईल. मात्र, ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.>जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीनची सोय करण्याचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री महोदयांनी तशी घोषणा केली होती. दोन रुग्णालयात ही सेवा सुरू आहे. मात्र, इतर ठिकाणी टेलिमेडिसीनची व्यवस्था नाही. त्याबाबत अद्याप तरी आमच्याकडे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले नाही; परंतु ही यंत्रणा भविष्यात कार्यान्वित होईल व रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळेल.- नितीन देसाई,जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड