शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गरजेपोटीच्या घरांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर; मंदा म्हात्रेंचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

By नारायण जाधव | Updated: June 17, 2024 18:08 IST

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत

नवी मुंबई : नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली दि. २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची घरे नियमित करण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे उलटली तरी राज्य सरकारने याबाबतची अंतिम अधिसूचना न काढल्याने येथील प्रकल्पग्रस्तांत नाराजी आहे. ती ओळखून बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुन्हा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याविषयी आठवण करून दिली आहे. यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐन विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे.

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत. ती कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. याविषयी आमदार म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ही घरे नियमित करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनीच नगरविकासमंत्री असताना केली होती. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या हरकती-सूचना आणि अडचणी ऐकून त्याच्या अंमलबजावणीसाठीचा मसुदा पाठविण्याची सूचना केली होती. मात्र, वर्ष उलटूनदेखील सिडकोने तो न पाठविल्याने गेल्या वर्षीसुद्धा दि. ६ जून २०२३ पर्यंत पाठविण्याचे आदेश पुन्हा सिडकोला दिले होते. मात्र, शिंदे यांनी केलेल्या घोषणेला दोन वर्षे उलटली तरी अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही. यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आठवण करून दिली आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेEknath Shindeएकनाथ शिंदे