शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 06:37 IST

जरांगे पाटील उपोषणावर ठाम, पदयात्रा नवी मुंबईतच राेखण्यासाठी सरकारची धावपळ

-नारायण जाधवनवी मुंबई : एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, नाचत-आनंद व्यक्त करत राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांमुळे नवी मुबईत रात्रभर भगवे वादळ अवतरले. आता नाही तर कधीच नाही, या भावनेने सतत मराठा बांधव येथे जमत होते. त्यामुळे सायन-पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहात होता. ठिकठिकाणी करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था, काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण... तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले होते.   

आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला. ते पहाटे सहकाऱ्यांसह नवी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचे प्रयत्न सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होते.     

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते २६ जानेवारीला सकाळी नवी मुंबईतून मुंबईसाठी निघतील. आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे. 

झाेपेत असताना घेतल्या सह्या : मनाेज जरांगे पाटीलमी आज सकाळी झोपेत असताना काही पोलिस अधिकाऱ्यांनी लोणावळ्यात न्यायालयाचा आदेश आहे असे सांगत आझाद मैदानाची परवानगी नाकारलेल्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या. नंतर समजले तो कागद परवानगी नाकारलेला होता, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी काय दिली कारणे?

मुंबईत दररोज अंदाजे ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरीनिमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. आंदोलक मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. आझाद मैदानाची क्षमता ५ ते ६ हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे; तेथे आंदाेलकांसाठी मैदानात पर्याप्त जागा व सोयी-सुविधादेखील नाहीत. मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहने, अरुंद रस्ते,  पर्यायी रस्त्यांचा अभाव, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड, इतर अत्यावश्यक सेवांवरील परिणाम पाहता मुंबईतील सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. आंदाेलकांना आवश्यक सोयी-सुविधा मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही. आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हेच संयुक्तिक राहील. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार