शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 06:37 IST

जरांगे पाटील उपोषणावर ठाम, पदयात्रा नवी मुंबईतच राेखण्यासाठी सरकारची धावपळ

-नारायण जाधवनवी मुंबई : एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, नाचत-आनंद व्यक्त करत राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांमुळे नवी मुबईत रात्रभर भगवे वादळ अवतरले. आता नाही तर कधीच नाही, या भावनेने सतत मराठा बांधव येथे जमत होते. त्यामुळे सायन-पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहात होता. ठिकठिकाणी करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था, काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण... तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले होते.   

आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला. ते पहाटे सहकाऱ्यांसह नवी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचे प्रयत्न सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होते.     

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते २६ जानेवारीला सकाळी नवी मुंबईतून मुंबईसाठी निघतील. आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे. 

झाेपेत असताना घेतल्या सह्या : मनाेज जरांगे पाटीलमी आज सकाळी झोपेत असताना काही पोलिस अधिकाऱ्यांनी लोणावळ्यात न्यायालयाचा आदेश आहे असे सांगत आझाद मैदानाची परवानगी नाकारलेल्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या. नंतर समजले तो कागद परवानगी नाकारलेला होता, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी काय दिली कारणे?

मुंबईत दररोज अंदाजे ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरीनिमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. आंदोलक मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. आझाद मैदानाची क्षमता ५ ते ६ हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे; तेथे आंदाेलकांसाठी मैदानात पर्याप्त जागा व सोयी-सुविधादेखील नाहीत. मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहने, अरुंद रस्ते,  पर्यायी रस्त्यांचा अभाव, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड, इतर अत्यावश्यक सेवांवरील परिणाम पाहता मुंबईतील सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. आंदाेलकांना आवश्यक सोयी-सुविधा मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही. आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हेच संयुक्तिक राहील. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार