शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 06:37 IST

जरांगे पाटील उपोषणावर ठाम, पदयात्रा नवी मुंबईतच राेखण्यासाठी सरकारची धावपळ

-नारायण जाधवनवी मुंबई : एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, नाचत-आनंद व्यक्त करत राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांमुळे नवी मुबईत रात्रभर भगवे वादळ अवतरले. आता नाही तर कधीच नाही, या भावनेने सतत मराठा बांधव येथे जमत होते. त्यामुळे सायन-पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहात होता. ठिकठिकाणी करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था, काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण... तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले होते.   

आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला. ते पहाटे सहकाऱ्यांसह नवी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचे प्रयत्न सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होते.     

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते २६ जानेवारीला सकाळी नवी मुंबईतून मुंबईसाठी निघतील. आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे. 

झाेपेत असताना घेतल्या सह्या : मनाेज जरांगे पाटीलमी आज सकाळी झोपेत असताना काही पोलिस अधिकाऱ्यांनी लोणावळ्यात न्यायालयाचा आदेश आहे असे सांगत आझाद मैदानाची परवानगी नाकारलेल्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या. नंतर समजले तो कागद परवानगी नाकारलेला होता, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी काय दिली कारणे?

मुंबईत दररोज अंदाजे ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरीनिमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. आंदोलक मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. आझाद मैदानाची क्षमता ५ ते ६ हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे; तेथे आंदाेलकांसाठी मैदानात पर्याप्त जागा व सोयी-सुविधादेखील नाहीत. मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहने, अरुंद रस्ते,  पर्यायी रस्त्यांचा अभाव, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड, इतर अत्यावश्यक सेवांवरील परिणाम पाहता मुंबईतील सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. आंदाेलकांना आवश्यक सोयी-सुविधा मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही. आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हेच संयुक्तिक राहील. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार