शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 09:30 IST

Ganesh Naik Eknath Shinde: कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

नवी मुंबई : शहरवासीयांना विश्वासात न घेता १४ गावे नवी मुंबईवर लादली आहेत. हा भुर्दंड कदापि सहन करणार नाही. करदात्यांच्या पैशांचा दुरूपयोग होऊ देणार नसून नवी मुंबईच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला जाईल, अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. 

कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षे मालमत्ता कर वाढविलेला नाही. २०४५ पर्यंत अजून २० वर्षे करवाढ केली जाणार नाही. शहराचा विकास करताना नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला जाणार नाही. 

नवी मुंबईकरांच्या हितापुढे मंत्रिपद महत्त्वाचे नाही

नवी मुंबईकरांना विश्वासात न घेता १४ गावे लादली आहेत. या गावांच्या सोयी-सुविधांसाठी ६८०० कोटी  रुपयांची गरज असून ती द्यावी, असा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. 

अतिक्रमणे काढून देण्याची मागणीही केली होती. परंतु, या अटींचा विचार न करता या गावांचा समावेश केला आहे. आता शहरवासीयांनी कररूपाने दिलेल्या पैशांतून तेथील गावांचा विकास करायचा का?, नागरिकांना हा भुर्दंड सहन करू दिला जाणार नाही. शहराच्या हितासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल. नवी मुंबईच्या हितापुढे आमदार, मंत्रिपद महत्त्वाचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक सूरज पाटील, गणेश भगत आदी उपस्थित होते. 

हा नाईक-शिंदे वाद नाही

१४ गावांच्या विकासासाठी लागणारा ६८०० कोटींचा भुर्दंड  नवी मुंबईकरांनी का सहन करायचा. आमची भूमिका नवी मुंबईच्या हिताची आहे. काहीजण याला शिंदे-नाईक विरोधाचा रंग देत आहेत; पण हा राजकीय  विरोधाचा विषय  नसून नवी मुंबईचे नुकसान टाळण्यासाठीची भूमिका असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा