रिक्षांच्या शेअरगिरीमुळे ठाणोकर वेठीस
By Admin | Updated: June 8, 2014 01:16 IST2014-06-08T01:16:55+5:302014-06-08T01:16:55+5:30
या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे.

रिक्षांच्या शेअरगिरीमुळे ठाणोकर वेठीस
>ठाणो : या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे. कारण या पैकी 9क् टक्के रिक्षावाल्यांनी बक्कळ कमाई देणा:या शेअर सिस्टीममध्येच व्यवसाय करण्याचे ठरविल्याने ही स्थिती ओढावली आहे. ठाण्याच्या कोणत्याही भागात स्वतंत्र रिक्षा करायची म्हटली तर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसावे लागते.
रात्री तर रेल्वे स्थानकासमोरच भयानक स्थिती असते. 12 वाजेनंतर हाफरिटर्न सुरू होत असल्याने अनेक रिक्षा स्थानकाच्या परिसरात रिक्षांची रांग सुरू होते त्या मर्यादे
पलिकडे 11.3क् पासून उभ्या राहतात त्या 12 वाजल्यानंतरच रांगेत येतात. परिणामी या अर्धा तासात
प्रवाशांची रांग एक ते दोन किमी. लांबी ओलांडून जाते. रिक्षावाल्यांची कमाई होते, पण ठाणोकरांचा खोळंबा निष्कारण होतो.
वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तुम्ही मीटरपद्धतीनेच किंवा शेअरपद्धतीनेच व्यवसाय करा, अशी सक्ती कायद्याने करता येत नाही. त्यामुळे येथे आमचा नाईलाज आहे.
कारण ते भाडे नाकारत नाहीत, भाडे जास्त घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या कारणासाठी प्रतिबंध करणार? मी थकलो होतो, मला विश्रंतीची गरज होती म्हणून मी रिक्षा थांबवली असे तो म्हणून शकतो. (विशेष प्रतिनिधी)
च्अमूक काळात रिक्षा चालविलीच पाहिजे असे बंधन कायद्याने कसे घालणार? याचा अर्थ कायद्यानेही त्यांच्या पुढे हात टेकले आहेत.
च्असाच प्रकार युनियनच्या बाबतीतही आहे तिनेही आपली हताशत: अशाच शब्दांत व्यक्त केली आहे.
च्म्हणजे काय चालले आहे हे सगळ्यांना माहिती. ते चुकीची आहे हेही सगळ्य़ांना माहिती, परंतु सगळ्य़ांनी गांधारी व्हायचे ठरविले आहे यात मरण बिचा:या ठाणोकरांचे होते.
रिक्षावाल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सगळेच जण आपल्या पोळीवर जास्तीत जास्त तूप ओढून घेत असतातना रिक्षावाल्यांनीच संत तुकाराम कशासाठी व्हायचे. आम्हीही कमी खर्च आणि श्रमात जर कायदानुसार दोन पैसे जास्त मिळविले तर त्यात चूक काय ? मीटरने केलेला व्यवसाय आणि शेअरने केलेला व्यवसाय यात अडीच ते तीन पटीचा फरक पडतो. शिवाय इंधन आणि कष्ट तसेच वाहनाची ङिाज याच्यात बचत होते ती वेगळीच. ती गृहीत धरली तर हा फरक साडेतीन ते चारपटीत जातो. त्यामुळेच बहुसंख्य रिक्षावाले शेअर रूटवरच रिक्षा चालविणो पसंत करतात.
हाफ रिटर्नकडे असतो कल
यात मराठी आणि परप्रांतीय अशा सगळ्याच रिक्षाचालकांचा समावेश असल्याने ठाणोकरांची कोंडी झाली आहे. रात्रीच्या वेळी शेअर फारसे मिळत नाही, मग अर्धा तास थांबून हाफ रिटर्नचे प्रवासी घेण्याकडे त्यांचा मोठा कल असतो. यामुळे ठाण्याच्या कोणत्याही परिसरात स्वतंत्र रिक्षा मिळणो अवघड झालेले आहे.