शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

राष्ट्रवादी-सेनेच्या राड्याने शहरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:54 IST

परस्पर विरोधात तक्रारी दाखल : खुनाच्या प्रयत्नासह विनयभंगाचेही आरोप; ऐरोलीसह कोपरखैरणे बंद

नवी मुंबई : ऐरोलीत राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना नगरसेवकांवर खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही मारामारी व विनयभंगाचे आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून, ऐरोलीसह कोपरखैरणे परिसर बंद केला होता.

नवी मुंबईमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील परिसर म्हणून ऐरोलीची ओळख आहे. काही वर्षांपासून शांत असलेला हा परिसर शुक्रवारी राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यामुळे पुन्हा हादरून गेला आहे. सेक्टर ५ मधील महापालिकेने बांधलेल्या मंगलकार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. राड्यानंतर दोन्हीकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी नियोजबद्द कट करून राडा घडवून आणल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. महापालिकेच्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रण असल्यामुळे आम्ही तिथे आलो होतो; परंतु मढवी यांनी मुद्दाम गोंधळ घातला व अपशब्द वापरले. वाद वाढू नये, यासाठी कार्यक्रमातून जाण्याचा प्रयत्न केला असता, रॉड व कैचीने हल्ला करण्यात आला.

अंगरक्षकांनी हल्लेखोरांना अडविले. गाडीत बसल्यानंतर हल्लेखोरांनी कारच्या काचा फोडल्या असून, त्यांच्याविरोधात रीतसर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल, असा इशाराही दिला. महापौर जयवंत सुतार यांनीही मढवी यांच्यावर आरोप केले आहेत. गोंधळ होण्याची शक्यता असल्याने बंदोबस्ताची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार उपस्थित होते.

शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. एम. के. मढवी यांनी आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनया मढवी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला असून, याविषयी लेखी तक्रार केली आहे. वैभव नाईक यांनीही कार्यक्रम स्थळी येऊन शिवीगाळ केली व बंदूक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. खासदार राजन विचारे यांनीही, राष्ट्रवादीने खोटे गुन्हे दाखल केले आहेत, राष्ट्रवादी विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी खासदारनिधी देऊनही त्याचा वापर केला नाही. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वास्तू बांधून झाल्यानंतरही त्यांची उद्घाटने घेतली जात नसल्याचा आरोपही केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विनया मढवी आदी. उपस्थित होते.खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाराष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या तक्रारीवरून शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी, कुणाल म्हात्रे, अजय म्हात्रे, राजा यादव, अनिल मोरे, ऋषभ उपाध्याय, मढवी यांचा दुसरा चालक व इतरांविरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.शिवसेनेने केलेली तक्रारशिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या सर्वांनी धक्काबुक्की केली व विनया मढवी यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक यांनी कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ केली. पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला.

काँग्रेसनेही केला निषेधआमदार व उपमहापौरांसह इतरांना धक्काबुक्की झाल्याचा काँगे्रसनेही निषेध केला आहे. उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या संबंधित नगरसेवकांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती असून त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार, या प्रकरणी कडक कारवाईची मागणीही केली आहे.

दुकाने बंद करण्याचा प्रयत्नराष्ट्रवादीच्या आमदारांची गाडी फोडल्याचे वृत्त समजल्यानंतर ऐरोली व कोपरखैरणे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद न करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली.दहा वर्षांनंतर पुन्हा राडेबाजीऐरोली हा यापूर्वी संवेदनशील विभाग म्हणून ओळखला जात होता. यापूर्वी चार नगरसेवकांचे व अनेक राजकीय पदाधिकाºयांचे खून या परिसरामध्ये झाले आहेत. २००८ पासून या परिसरामधील राडेबाजी कमी झाली होती. नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. शिवसेना व राष्ट्रवादीमधील राडेबाजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा राडेबाजी सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उद्घाटनांवरून तिसºयांदा राडानवी मुंबईमध्ये उद्घाटन व नामफलकांच्या अनावरणावरून यापूर्वीही गोंधळ झाला आहे. ३० एप्रिल २००६ मध्ये सीबीडीमधील राजीव गांधी मैदानाच्या बाजूला असलेल्या सभामंडपाच्या उद्घाटनास तत्कालीन विधानपरिषद सदस्या मंदा म्हात्रे यांना बोलावण्यात आले नाही, यामुळे तत्कालीन मंत्री गणेश नाईक व म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर मे २०१४ मध्ये दिवाळे जेट्टीच्या उद्घाटनाचा आमदार मंदा म्हात्रे यांच्या नावाचा फलक काढण्यात आला, यामुळे नाईक व म्हात्रे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता पुन्हा ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये उद्घाटनाच्या श्रेयावरून वाद झाला असून नवी मुंबईमध्ये पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.