शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

मनोरी खाडीवरील पुलासाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:44 PM

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात : उद्योजक, बिल्डरांनी घेतल्या जमिनी

ठळक मुद्देपूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे.

मीरा रोड / भार्इंदर : मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने पुलाच्या कामासाठी निविदा काढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पवित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात मोठ्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी पूल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पूल बांधण्यास ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो- रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजूर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुलासारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे कामही बंद पाडण्यात आले होते .मुंबई , ठाण्यातील बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरीसह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावाच्या धारावी बेटावरील गावे उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसर्गिक पर्यावरणासह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे, भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे, गावची संस्कृती कायम रहावी अशी भूमिका या विरोधामागे धारावी बेट बचावसह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.पूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मूळात या ठिकाणी उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या असून त्या विकासासाठी मोकळ्या करण्यासाठी तसेच त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी सातत्याने पूल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जोसेफ घोन्सालवीस, संदीप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सातत्याने डोळेझाकसरकार, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पूल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्ययावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहीत. अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करूनही त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहीत. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसतानाही आमच्यावर लादत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई