शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:21 IST

Nerul Railway: ट्रेनच्या डब्यावर चढून सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना एका १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

इंस्टाग्राम रील बनवण्याच्या वेडात लोक अनेकदा स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ करताना दिसतात. अशा घटनांमध्ये अनेकदा मोठे अपघात घडतात. नुकताच नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकावर (Nerul Railway Station) असाच एक हृदयद्रावक प्रकार घडला आहे. रीलच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपला जीव गमावला आहे. 

नेरुळ रेल्वे स्थानकावर कचरा आणि मातीने भरलेल्या, उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर चढून सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना एका १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बेलापूर येथे राहणारा आरव श्रीवास्तव नावाचा हा मुलगा ६ जुलै रोजी आपल्या मित्रांसोबत रेल्वे स्थानकावर गेला होता. तो कचऱ्याने भरलेल्या, एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर चढला आणि रील बनवण्याचा प्रयत्न करत होता. 

विद्युत तारेला स्पर्श झाला अन्.. 

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, डब्यावर चढत असताना आरवचा हात वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला (High Power Cable) लागला. यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खाली पडला. या धक्क्यामुळे मुलाच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. तो ६० ते ६५ टक्के भाजला होता. आरवला सुरुवातीला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं उंद्रे यांनी सांगितलं.

आरवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात (Burns Hospital) हलवण्यात आलं. तिथे तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता आणि अखेर शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई