शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:50 IST

सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी इतवारी सराफा बाजारात अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

नवी मुंबई : शाहबाज गाव येथील टँकरमाफियांचे पाणीचोरीचे अड्डे अखेर पालिकेने उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी मोरबेची जलवाहिनी फोडून पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी येऊनही संबंधितांवर कारवाई होत नव्हती. अखेर टँकरमाफियांकडून होणाऱ्या पाणीचोरीच्या प्रकाराचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शाहबाज गाव येथे रेल्वे पुलाखाली अनेक महिन्यांपासून मोरबेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी सुरू होती. राजकीय वरदहस्त व पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांच्या छुप्या संमतीने त्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. रेल्वेरूळ व रस्त्यालगतच ही पाणीचोरी सुरू असतानाही पालिका अधिकाऱ्यांची त्यावर नजर पडत नव्हती. तर काही दक्ष नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचीही दिशाभूल करून प्रकरण दडपण्याचे प्रकार सुरू होते. यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या पाणीचोरीमुळे पालिकेला कोट्यवधींचा फटका बसत होता. एकीकडे जमाखर्चाचा मेळ जुळवत पालिकेने उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र बिलापोटी मिळणारी रक्कम फारच कमी असल्याने पाण्यावर होणाऱ्या जमाखर्चातली तफावत भरून काढणे पालिकेला गेल्या कित्येक वर्षांत जमलेला नाही. शहरातल्या १२ लाख लोकसंख्येसाठी एकूण ४२२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १९ टक्के होणारी गळती थांबवण्याचे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांना ही गळती थांबवण्यात यश आलेले नाही. गळतीचे हे प्रमाण लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी देखील वारंवार याविषयी आवाज उठवलेला आहे. अशातच शहरात टँकरमाफियांकडून सुरू असलेल्या पाणीचोरीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने त्या ठिकाणी कारवाई करून सात डिझेल पंप जप्त केले. तसेच या कारवाईची माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असतानाच उघड झालेल्या पाणीचोरीचा संताप सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.> पाणीचोरीच्या प्रकाराबाबात पालिकेचे कार्यकारी अभियंते अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती नाकारली होती. त्या ठिकाणी कसलीही गळती नसून पाणीचोरी होत नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या कारवाईत त्या ठिकाणची पाणीचोरी उघड झाली आहे. तर कारवाईदरम्यान विभाग अधिकारी धर्मेंद्र गायकवाड यांनीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. टँकरमध्ये भरले जाणारे पाणी मोरबेच्या जलवाहिनीचे नसून साचलेले सांडपाणी असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.संपूर्ण कारवाईत त्यांना मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेला नळ दिसला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कारवाईदरम्यान राजकीय व्यक्तींनी उपस्थित राहून त्यांचे टँकरमाफियांसोबतचे हितसंबंध उघड केले.