शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:50 IST

सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी इतवारी सराफा बाजारात अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

नवी मुंबई : शाहबाज गाव येथील टँकरमाफियांचे पाणीचोरीचे अड्डे अखेर पालिकेने उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी मोरबेची जलवाहिनी फोडून पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी येऊनही संबंधितांवर कारवाई होत नव्हती. अखेर टँकरमाफियांकडून होणाऱ्या पाणीचोरीच्या प्रकाराचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शाहबाज गाव येथे रेल्वे पुलाखाली अनेक महिन्यांपासून मोरबेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी सुरू होती. राजकीय वरदहस्त व पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांच्या छुप्या संमतीने त्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. रेल्वेरूळ व रस्त्यालगतच ही पाणीचोरी सुरू असतानाही पालिका अधिकाऱ्यांची त्यावर नजर पडत नव्हती. तर काही दक्ष नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचीही दिशाभूल करून प्रकरण दडपण्याचे प्रकार सुरू होते. यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या पाणीचोरीमुळे पालिकेला कोट्यवधींचा फटका बसत होता. एकीकडे जमाखर्चाचा मेळ जुळवत पालिकेने उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र बिलापोटी मिळणारी रक्कम फारच कमी असल्याने पाण्यावर होणाऱ्या जमाखर्चातली तफावत भरून काढणे पालिकेला गेल्या कित्येक वर्षांत जमलेला नाही. शहरातल्या १२ लाख लोकसंख्येसाठी एकूण ४२२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १९ टक्के होणारी गळती थांबवण्याचे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांना ही गळती थांबवण्यात यश आलेले नाही. गळतीचे हे प्रमाण लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी देखील वारंवार याविषयी आवाज उठवलेला आहे. अशातच शहरात टँकरमाफियांकडून सुरू असलेल्या पाणीचोरीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने त्या ठिकाणी कारवाई करून सात डिझेल पंप जप्त केले. तसेच या कारवाईची माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असतानाच उघड झालेल्या पाणीचोरीचा संताप सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.> पाणीचोरीच्या प्रकाराबाबात पालिकेचे कार्यकारी अभियंते अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती नाकारली होती. त्या ठिकाणी कसलीही गळती नसून पाणीचोरी होत नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या कारवाईत त्या ठिकाणची पाणीचोरी उघड झाली आहे. तर कारवाईदरम्यान विभाग अधिकारी धर्मेंद्र गायकवाड यांनीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. टँकरमध्ये भरले जाणारे पाणी मोरबेच्या जलवाहिनीचे नसून साचलेले सांडपाणी असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.संपूर्ण कारवाईत त्यांना मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेला नळ दिसला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कारवाईदरम्यान राजकीय व्यक्तींनी उपस्थित राहून त्यांचे टँकरमाफियांसोबतचे हितसंबंध उघड केले.