शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:50 IST

सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी इतवारी सराफा बाजारात अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

नवी मुंबई : शाहबाज गाव येथील टँकरमाफियांचे पाणीचोरीचे अड्डे अखेर पालिकेने उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी मोरबेची जलवाहिनी फोडून पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी येऊनही संबंधितांवर कारवाई होत नव्हती. अखेर टँकरमाफियांकडून होणाऱ्या पाणीचोरीच्या प्रकाराचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शाहबाज गाव येथे रेल्वे पुलाखाली अनेक महिन्यांपासून मोरबेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी सुरू होती. राजकीय वरदहस्त व पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांच्या छुप्या संमतीने त्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. रेल्वेरूळ व रस्त्यालगतच ही पाणीचोरी सुरू असतानाही पालिका अधिकाऱ्यांची त्यावर नजर पडत नव्हती. तर काही दक्ष नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचीही दिशाभूल करून प्रकरण दडपण्याचे प्रकार सुरू होते. यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या पाणीचोरीमुळे पालिकेला कोट्यवधींचा फटका बसत होता. एकीकडे जमाखर्चाचा मेळ जुळवत पालिकेने उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र बिलापोटी मिळणारी रक्कम फारच कमी असल्याने पाण्यावर होणाऱ्या जमाखर्चातली तफावत भरून काढणे पालिकेला गेल्या कित्येक वर्षांत जमलेला नाही. शहरातल्या १२ लाख लोकसंख्येसाठी एकूण ४२२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १९ टक्के होणारी गळती थांबवण्याचे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांना ही गळती थांबवण्यात यश आलेले नाही. गळतीचे हे प्रमाण लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी देखील वारंवार याविषयी आवाज उठवलेला आहे. अशातच शहरात टँकरमाफियांकडून सुरू असलेल्या पाणीचोरीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने त्या ठिकाणी कारवाई करून सात डिझेल पंप जप्त केले. तसेच या कारवाईची माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असतानाच उघड झालेल्या पाणीचोरीचा संताप सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.> पाणीचोरीच्या प्रकाराबाबात पालिकेचे कार्यकारी अभियंते अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती नाकारली होती. त्या ठिकाणी कसलीही गळती नसून पाणीचोरी होत नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या कारवाईत त्या ठिकाणची पाणीचोरी उघड झाली आहे. तर कारवाईदरम्यान विभाग अधिकारी धर्मेंद्र गायकवाड यांनीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. टँकरमध्ये भरले जाणारे पाणी मोरबेच्या जलवाहिनीचे नसून साचलेले सांडपाणी असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.संपूर्ण कारवाईत त्यांना मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेला नळ दिसला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कारवाईदरम्यान राजकीय व्यक्तींनी उपस्थित राहून त्यांचे टँकरमाफियांसोबतचे हितसंबंध उघड केले.