शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:55 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे आणण्यास सांगत आहेत. अशा डॉक्टरांना त्वरित निलंबित करा, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा घेतला. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टरांकडून खासगी औषधांच्या दुकानातून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. किमान तीन हजार रुपयांपर्यंतचा किंबहुना त्यापेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड संबंधित रुग्णाला सोसावा लागत आहे, परंतु सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा शिल्लक असताना रुग्णांना नाहक त्रास दिला जात असल्याने, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली.खासगी औषध दुकानामधून औषधे आणण्याचा आग्रह धरणाºया संबंधित डॉक्टरांना तातडीने निलंबित करा, असे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.तीन बेड सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन बेड सौम्य लक्षणे असणाºया रु ग्णांसाठी जिल्ह्यातील आॅक्सिजन आणि आयसीयू बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. वाढणारा आकडा लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान तीन बेड हे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाºयांसाठी आरक्षित करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.‘आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा’माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढील कालावधीत रुग्ण वाढण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकार, प्रशासनाची आहे. मात्र, कोणतेही दुखण अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचार घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस