शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:55 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे आणण्यास सांगत आहेत. अशा डॉक्टरांना त्वरित निलंबित करा, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा घेतला. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टरांकडून खासगी औषधांच्या दुकानातून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. किमान तीन हजार रुपयांपर्यंतचा किंबहुना त्यापेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड संबंधित रुग्णाला सोसावा लागत आहे, परंतु सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा शिल्लक असताना रुग्णांना नाहक त्रास दिला जात असल्याने, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली.खासगी औषध दुकानामधून औषधे आणण्याचा आग्रह धरणाºया संबंधित डॉक्टरांना तातडीने निलंबित करा, असे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.तीन बेड सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन बेड सौम्य लक्षणे असणाºया रु ग्णांसाठी जिल्ह्यातील आॅक्सिजन आणि आयसीयू बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. वाढणारा आकडा लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान तीन बेड हे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाºयांसाठी आरक्षित करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.‘आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा’माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढील कालावधीत रुग्ण वाढण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकार, प्रशासनाची आहे. मात्र, कोणतेही दुखण अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचार घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस