शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

अखेर पालिका विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:34 IST

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून शालेय गणवेशापासून वंचित असून, शैक्षणिक वर्ष संपताना तब्बल तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत गणवेश दिले जाणार आहेत.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून शालेय गणवेशापासून वंचित असून, शैक्षणिक वर्ष संपताना तब्बल तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत गणवेश दिले जाणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मांडण्यात आला आहे.नवी मुंबई शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी आणि कॉलनीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाºया प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, मोजे यासासारखे शालेय साहित्य, गणवेश देण्यात येत होते. तसेच पूरक पोषण आहार, मध्यान्य भोजन यासारख्या सुविधादेखील देण्यात येत आहेत. पालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा पटदेखील दरवर्षी वाढत आहे.राज्यातील पालिकेमार्फत देण्यात येणाºया गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी शैक्षणिक वर्ष २0१६ -१७ साली राज्य सरकारने डीबीटी धोरण संपूर्ण राज्यात लागू केले. शासनाने आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने २०१६-१७ साली गणवेश बनविण्याचा ठेका पालिकेने रद्द केला. त्यावर्षी ठेकेदाराने तयार केलेले प्राथमिक विभागाचे गणवेश शाळांमध्ये जाऊन विक्री केले होते. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत. २0१७-१८ साली प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बाजारात पालिका शाळेचे गणवेश उपलब्ध झाले नाहीत. माध्यमिक शाळांचे गणवेश काही ठिकाणी मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी खरेदी केले होते आणि त्याची बिले देखील पालिकेकडे जमा केली होती; परंतु आर्थिक परिस्थितीने गरीब असलेले पालक २0१७-१८ साली देखील शालेय गणवेश खरेदी करू न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जुनेच गणवेश वापरले तर नव्याने प्रवेश घेतलेले आणि जुने गणवेश खराब झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशापासून दूर राहावे लागले होते. २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षात राज्य सरकारने शालेय गणवेश पालिकेनेच पुरवावेत असा नियम करून ४ जुलै २०१८ रोजी त्याबाबतचा अध्यादेशदेखील काढला होता. २४ जुलै २०१८ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गणवेश पुरविण्याच्या प्रस्तावाला मान्यतादेखील देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया, नमुने तपासणी अहवाल, दर आदी बाबीमुळे विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात डिसेंबर मध्यावर आला तरी गणवेश मिळालेले नाहीत. स्थायी समिती सभेत गणवेशपुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सुमारे आठ कोटी ११ लाख ७० हजार रु पये खर्च करण्यात येणार आहेत.शासनाने सुरू केलेल्या डीबीटी धोरणानुसार विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करून त्याची बिले महापालिकेत जमा करायची आहेत. त्यानंतर महापलिकडून सादर रक्कम विद्यार्थी आणि पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महापालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदी करणे जमत नाही. त्यामुळे महापालिकेत यावर्षी एकाही विद्यार्थ्याने साहित्य खरेदी केले नसून महापालिकेकडे बिले जमा झाली नाहीत.शालेय गणवेश पूर्व प्राथमिक ते आठवी प्रत्येकी २ गणवेशपीटी गणवेश इयत्ता पहिली ते ८वी प्रत्येकी १ गणवेशस्काउट गाइड इयत्ता ३ री ते ५ वी प्रत्येकी १ गणवेशशालेय गणवेश इयत्ता ९ वी व १0 वी प्रत्येकी २ गणवेशशालेय गणवेश पुरविण्यासंदर्भात शासनाने जीआर काढल्यावर तत्काळ महासभेची मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतर निविदा आणि तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास वेळ गेला आहे; परंतु करारात नमूद करण्यात आल्याप्रमाणे त्या वेळेपर्यंत गणवेशाचे वाटप केले जाणार आहे.- संदीप संगवे,शिक्षणाधिकारी, न.मुं.म.पा.

टॅग्स :Studentविद्यार्थीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSchoolशाळाEducationशिक्षण