शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

अलिबागजवळील अदानींचा सिमेंट प्लांट राज्याने नाकारला, माहिती अधिकारात उघड

By नारायण जाधव | Published: April 17, 2024 6:33 PM

नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मार्च २०२२ मध्ये राज्य पर्यावरण विभागाकडे अदानी सिमेंट प्लांट आणि शहापूर व शाहबाज गावांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संबंधित सुविधांशी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा तपशील मागवून एक अर्ज दाखल केला होता.

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागनजीकच्या शहाबाज गावात सिमेंट प्लांट उभारण्याचा अदानी सिमेंटेशन कॉर्पोरेशनचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने नाकारला असल्याची माहिती आरटीआयअन्वये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल २०२१ मध्येच हा प्रकल्प नाकारण्यात आला असला, तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे एक वर्षानंतर एप्रिल, २०२२ मध्ये सार्वजनिक सुनावणी घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रे दाखवितात.

नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मार्च २०२२ मध्ये राज्य पर्यावरण विभागाकडे अदानी सिमेंट प्लांट आणि शहापूर व शाहबाज गावांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संबंधित सुविधांशी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा तपशील मागवून एक अर्ज दाखल केला होता. त्याला तब्बल दोन वर्षांनंतर १६ एप्रिल, २०२४ दिलेल्या एका ओळीच्या उत्तरात उपलब्ध माहितीनुसार, अदानी सिमेंटेशन कॉर्पोरेशनचा प्रकल्प नाकारण्यात आल्याचे उत्तर दिले आहे.

पर्यावरण विभागाने आपल्या उत्तरात २८ एप्रिल, २०२१ रोजी अदानी सिमेंटेशन कॉर्पोरेशनला उद्देशून राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA)च्या सदस्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी स्वाक्षरी केलेला एक दस्तऐवज जोडला आहे. टाइप केलेल्या पत्रावरील तारीख उघडपणे हाताने दुरुस्त केली असल्याकडे कुमार यांनी लक्ष वेधले.

राज्य पर्यावरण मूल्यमापन समितीच्या शिफारशींनुसार कंपनीचा प्रस्ताव नाकारल्याचे पत्रात नमूद असले, तरी पत्रात कोणताही तपशील दिलेला नाही. यामुळे सविस्तर माहितीसाठी आता आरटीआय कायद्यांतर्गत नवीन अर्ज दाखल केल्याचे कुमार यांनी सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी नाकारल्यानंतर सरकारने जनसुनावणी कशी घेतली. अंबा नदीच्या दक्षिणेकडील तीरावर प्रस्तावित असलेला हा प्रकल्प एका सिमेंट ग्राइंडिंग युनिटसाठी होता. ज्याची सिमेंट उत्पादन क्षमता वर्षाला ३ टन आणि दोन टन फ्लाय ॲश प्रक्रिया क्षमता होती. इतर सुविधांमध्ये बर्थिंग जेट्टी, स्टोरेज आणि बॅकअपसह कन्व्हेअर कॉरिडॉर इत्यादींचा समावेश आहे...........जनसुनावणीत प्रकल्प व्यवस्थापकांनी केलेल्या सादरीकरणात अदानी सिमेंटची पर्यावरण व्यवस्थापन योजनेत २५ कोटी गुंतविण्याची योजना होती. ‘एमपीसीबी’ने प्रकाशित केलेल्या प्रकल्पाच्या माहितीत म्हटले आहे की, ‘प्रस्तावित उपक्रमांचा पर्यावरणावर परिणाम होईल’ आणि म्हणून योग्य पर्यावरण व्यवस्थापन योजना आवश्यक आहे. प्रभावामध्ये पाण्याची गुणवत्ता, गाळाची गुणवत्ता, पेलाजिक आणि बेंथिक उत्पादक निवासस्थान आणि पर्यावरणाच्या अखंडतेवर संभाव्य परिणामांचा समावेश होतो............

प्रस्तावित प्रकल्पाच्या विकासामुळे स्थानिक लोकांना सीएसआर उपक्रमांद्वारे भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, रोजगार मिळणार होते, तसेच गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तो आवश्यक असला, तरी पर्यावरण रक्षणाशी समतोल साधला गेला पाहिजे, असे कुमार म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई