शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:58 IST

प्रशासनाच्या अपयशामुळे संस्थेचे नुकसान; १६० कोटींची कामे धिम्या गतीने, सहा वर्षांत दोनच प्रकल्प पूर्ण

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळ अस्तित्वात असताना १६० कोटी रुपये खर्चाच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे बांधकाम सुरू केले. सहा वर्षांमध्ये यामधील फक्त दोनच प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. तीन प्रकल्पांचे काम धिम्या गतीने सुरू आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे संस्थेचे नुकसान होऊ लागले आहे.शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. २००७ पासून मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन व साखरेसह अनेक महत्त्वाच्या वस्तू नियमनमुक्त करण्याच्या निर्णयामुळे संस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजार फीच्या माध्यमातून होणारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे या पूर्वीच्या संचालक मंडळाने दोन कोल्ड स्टोरेज, एक व्यापारी इमारत व दोन निर्यात भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. २०१२ मध्येच सुरू झालेल्या या कामांवर जवळपास १६० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वास्तविक २०१५ पर्यंत यामधील सर्व प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला १७ कोटी रुपये खर्च करून निर्यात भवन बांधले आहे. हे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, त्यामधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत; परंतु त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नसल्यामुळे तो निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. कांदा मार्केटला लागून ३० कोटी रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेजची इमारत उभी केली आहे. हे बांधकामही वेळेत पूर्ण करता आलेले नाही. ५ जानेवारीला या बांधकामाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे.एपीएमसीच्या फळ मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी नवीन विस्तारीत इमारत उभारण्याचे कामही सहा वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. सुरुवातीला २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन जवळपास ४८ कोटींवर गेला आहे. सद्यस्थितीमध्ये रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे केली जात आहेत. नियोजनामध्ये झालेल्या चुकांमुळे मार्केट व्यापार करण्यासाठी योग्य नसल्याचे आक्षेप व्यापाºयांनी घेतल्यामुळे पुन्हा सुधारित कामे करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप या मार्केटला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. माथाडी भवनच्या समोरील एल मार्केटच्या मागील बाजूला नवीन बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे कामही धिम्या गतीने सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असले तरी नक्की कधी पूर्ण होणार व भोगवटा प्रमाणपत्र कधी मिळणार, याविषयी काहीही स्पष्टता नाही.न्यायालयाची परवानगी लागणारकांदा मार्केटजवळील कोल्ड स्टोरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून, ५ जानेवारीला भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. बाजार समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यामुळे कोल्ड स्टोरेज भाडेतत्त्वावर देण्यासाठी बाजार समितीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बाजार समितीने यापूर्वीच अर्ज दाखल केला असून परवानगी मिळेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.बाजार समितीमधील एक कोल्ड स्टोरेज व निर्यातभवन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. उर्वरित निर्यात भवन, फळ मार्केट इमारत व कोल्ड स्टोरेजचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- व्ही. बी. बिरादार, अधीक्षक अभियंता, बाजार समिती

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई