शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:58 IST

प्रशासनाच्या अपयशामुळे संस्थेचे नुकसान; १६० कोटींची कामे धिम्या गतीने, सहा वर्षांत दोनच प्रकल्प पूर्ण

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळ अस्तित्वात असताना १६० कोटी रुपये खर्चाच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे बांधकाम सुरू केले. सहा वर्षांमध्ये यामधील फक्त दोनच प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. तीन प्रकल्पांचे काम धिम्या गतीने सुरू आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे संस्थेचे नुकसान होऊ लागले आहे.शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. २००७ पासून मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन व साखरेसह अनेक महत्त्वाच्या वस्तू नियमनमुक्त करण्याच्या निर्णयामुळे संस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजार फीच्या माध्यमातून होणारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे या पूर्वीच्या संचालक मंडळाने दोन कोल्ड स्टोरेज, एक व्यापारी इमारत व दोन निर्यात भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. २०१२ मध्येच सुरू झालेल्या या कामांवर जवळपास १६० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वास्तविक २०१५ पर्यंत यामधील सर्व प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला १७ कोटी रुपये खर्च करून निर्यात भवन बांधले आहे. हे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, त्यामधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत; परंतु त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नसल्यामुळे तो निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. कांदा मार्केटला लागून ३० कोटी रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेजची इमारत उभी केली आहे. हे बांधकामही वेळेत पूर्ण करता आलेले नाही. ५ जानेवारीला या बांधकामाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे.एपीएमसीच्या फळ मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी नवीन विस्तारीत इमारत उभारण्याचे कामही सहा वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. सुरुवातीला २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन जवळपास ४८ कोटींवर गेला आहे. सद्यस्थितीमध्ये रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे केली जात आहेत. नियोजनामध्ये झालेल्या चुकांमुळे मार्केट व्यापार करण्यासाठी योग्य नसल्याचे आक्षेप व्यापाºयांनी घेतल्यामुळे पुन्हा सुधारित कामे करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप या मार्केटला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. माथाडी भवनच्या समोरील एल मार्केटच्या मागील बाजूला नवीन बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे कामही धिम्या गतीने सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असले तरी नक्की कधी पूर्ण होणार व भोगवटा प्रमाणपत्र कधी मिळणार, याविषयी काहीही स्पष्टता नाही.न्यायालयाची परवानगी लागणारकांदा मार्केटजवळील कोल्ड स्टोरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून, ५ जानेवारीला भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. बाजार समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यामुळे कोल्ड स्टोरेज भाडेतत्त्वावर देण्यासाठी बाजार समितीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बाजार समितीने यापूर्वीच अर्ज दाखल केला असून परवानगी मिळेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.बाजार समितीमधील एक कोल्ड स्टोरेज व निर्यातभवन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. उर्वरित निर्यात भवन, फळ मार्केट इमारत व कोल्ड स्टोरेजचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- व्ही. बी. बिरादार, अधीक्षक अभियंता, बाजार समिती

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई