शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

वाशी खाडीवर लवकरच तिसरा पूल, मंजुरीनंतर प्राथमिक कार्यवाही सुरू, वाहतूककोंडीला बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 1:15 AM

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा पूल बांधला जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.वाशी खाडी येथे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा आणखी एक पूल उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून आहे. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उभारणी करावी, अशा स्वरूपाची चर्चाही सुरू होती. आॅक्टोबर २0१५मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुलाच्या बांधणीबाबत चर्चाही झाली होती, परंतु मागील दोन वर्षांत कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या पुलाच्या बांधकामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपविण्यात आली होती. अहवालाच्या आधारे १३ जून २0१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे तिसºया पुलाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या पुलाची निर्मिती करावी, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या पुलाच्या निर्मितीस मंजुरी दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदा म्हात्रे यांना कळविले आहे.मुंबई व नवी मुंबईला जोडणाºया सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. दोन्ही बाजूने महामार्ग रुंदावला असला, तरी सध्या वापर असलेल्या वाशी खाडीवरील पुलाची रुंदी वाढलेली नाही. या पार्श्वभूमीवर तिसरा खाडी पूल उपयुक्त ठरणार आहे.महामार्गावर वाहनांचा अतिरिक्त ताणबांधकाम विभागाने त्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात या पुलावरून दररोज सरासरी १२,५00 एवढ्या संख्येने वाहनांची ये-जा असेल, असे गृहीत धरले होते, परंतु मागील काही वर्षांत या पुलावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या पुलावरून सध्या दररोज सरासरी दोन ते अडीच लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांचा ताण पडत असल्याने, महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे.वाशी खाडीवर १९७0 ते ७५ या कालावधीत पहिला पूल उभारण्यात आला होता, पण अतिवापरामुळे हा खाडी पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९0 ते ९५दरम्यान त्यालगतच दुसºया खाडीपुलाची उभारणी केली होती.