शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोनसाखळी चोराला रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 03:22 IST

उलवे येथील गणेशपुरी परिसरात राहणाºया अर्चना कोळी या महिलेसोबत हा प्रकार घडला. त्या उरण फाटालगतच्या परिसरात घरकामानिमित्ताने दररोज ये-जा करतात.

नवी मुंबई : बस थांब्यावर उभ्या महिलेची सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शनिवारी दुपारी उरण फाटा येथे घडलेल्या या प्रकरणात अटक आरोपीकडून दोन गुन्हे उघड झाले आहेत. महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या मदतीला नागरिक धावून आल्याने तो पोलिसांच्या हाती लागला.

उलवे येथील गणेशपुरी परिसरात राहणाºया अर्चना कोळी या महिलेसोबत हा प्रकार घडला. त्या उरण फाटालगतच्या परिसरात घरकामानिमित्ताने दररोज ये-जा करतात. शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्या उलवेला जाण्यासाठी उरण फाटा येथील बसथांब्यावर उभ्या होत्या. यावेळी काही अंतरावर दुचाकी उभी करून त्याठिकाणी एक तरुण चालत आला. त्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातले दागिने खेचून पळ काढला. यावेळी महिलेने त्याला प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्याने मोटारसायकलवरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला असता ऐन वेळी त्याची मोटारसायकल सुरू झाली नाही. यामुळे तो पायी पळून जात असताना रस्त्याने जाणाºया एका कार चालकाने कार आडवी घालून त्याला अडवले. त्यांच्या मदतीला इतरही प्रवाशांनी धाव घेतल्याने सदर चोरटा हाती लागला. आल्वीन सुभाष डाव (३२) असे त्याचे नाव आहे. जमावाने त्याला चोप देवून सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तो टिळकनगरचा राहणारा असून चौकशीत त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिल्याचे सहायक निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी सांगितले. यानुसार त्याच्यावर सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून उपनिरीक्षक विक्रम साळुंखे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी