शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन

By नारायण जाधव | Published: May 03, 2024 4:23 PM

सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने संरक्षित असलेल्या डीपीएस फ्लेमिंगो तलावात येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणार नाही, तसेच खारफुटीची कत्तल होणार नाही, या वनविभागाला हमीपत्राद्वारे स्वत:च्या वचननाम्याचे सिडकोने सरासर उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. यामुळेच हा कोरडापडून परिसरात फ्लेमिंगोंचे मृत्यू होत असल्याचा दावा करून याबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिडकोने वनविभागाला दिलेल्या हमीपत्राचा महत्त्वाचा दस्तऐवज नॅटकनेक्ट फाउंडेशनने उघड केला आहे ज्यामध्ये सिडकोने नेरूळ जेट्टीच्या बांधकामात भरतीचे पाणी रोखणार नाही, असे आश्वासन दिले होते.

सिडकोचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. के. महाले यांनी दि. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी जलवाहतूक टर्मिनल प्रकल्पाच्या बांधकामासाठी ०.४६ हेक्टर खारफुटी वळती करण्यासाठी मंजुरी मिळण्याच्या विशिष्ट हेतूंसाठी हे हमीपत्र दाखल केले होते. महाले, आता निवृत्त झाले आहेत, त्यांनी खारफुटीच्या वळती करण्यासाठी वनविभागास दिलेल्या हमीपत्रावर स्वाक्षरी केल्याची पुष्टी केली, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. 

खारफुटीचे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने ही मंजुरी बंधनकारक होती. यानंतर नॅटकनेक्टने ही गंभीर बाब सिडकोचे मुख्य अभियंता एन. सी. बायस यांच्या निदर्शनास आणून तातडीने भरतीच्या पाण्याचे इनलेट साफ करण्याची विनंती केली आहे. “कोविडच्या आधी तलावाच्या दक्षिणेकडील एका मोठ्या वाहिनीवरून भरतीचे पाणी तलावात शिरताना दिसायचे,” असे नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी सांगितले. 

इनलेट अडवण्याचा गैरप्रकार कोविकाळा खंडित झाल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीने दाखल केलेल्या २०१३ च्या जनहित याचिका क्रमांक २१८ मध्ये, उच्च न्यायालयाने सिडकोने डीपीएस तलावात खाडीचे पाणी येईल, प्रवाह रोखला जाणार याची खात्री करावी, असा निर्णय दिला होता. 

सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, सिडकोने डीपीएस तलावात येणारा भरतीचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो आहाराच्या शोधात विचलित होऊन त्यांची वाट चुकल्यानेच त्यांचे मृत्यू होत आहेत. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हजच्या रेखा सांखला म्हणाल्या की, पक्षी विचलित होत असल्याने त्यांना दुखापत होत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यांचे निवासस्थान, म्हणजे डीपीएस तलावात कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई