शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

...म्हणून शॅडो कॅबिनेटमध्ये एवढ्या नेत्यांचा समावेश केला, राज ठाकरे यांनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:51 IST

MNS Shadow Cabinet : राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा केली असून, या प्रतिरूप मंत्रिमंडळात मनसेच्या अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांनी चांगले काम केल्यास प्रतिरूप मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन करावे, मात्र चुकीचं काम केल्यास सरकारचे वाभाढे काढावेअनेक चढउतार पाहत असताना तुम्ही माझ्यासोबत राहिलात त्याबाबत धन्यवादएवढे पराभव झाल्यानंतरही राज ठाकरेसोबत लोक राहतात कसे, याच गोष्टीचं  अनेकांना आश्चर्य वाटतं

नवी मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात मनसेच्या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली असून, या प्रतिरूप मंत्रिमंडळात मनसेच्या अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळात प्रत्येक खात्यासाठी एकाहून अधिक नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिरूप मंत्रिमंडळात अधिकाधिक नेत्यांचा समावेश करण्यामागचे कारण राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान उघड केले.

राज ठाकरे म्हणाले की, या प्रतिरूप मंत्रिमंडळात अनेक जणांचा समावेश केला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर कुणाला मंत्री झाल्यासारखं वाटू नये म्हणून प्रत्येक खात्यासाठी एकापेक्षा अधिक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या नेत्यांनी केवळ सरकारचे वाभाडेच काढावेत अशी अपेक्षा नाही. तर सरकारने चांगले काम केल्यास त्यांनी मंत्रिमंडळाचे अभिनंदन करावे. मात्र  चुकीचं काम केल्यास सरकार चालवणाऱ्या मंत्रिमंडळाचे वाभाढे काढावेत. तुम्ही चांगले काम कराल, अशी अपेक्षा आहे.’’

नवी मुंबईत झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेचे प्रतिरूप मंत्रिमंडळ जाहीर झाले असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- कुणाला मंत्री झाल्यासारखं वाटू नये म्हणून प्रतिरूप मंत्रिमंडळात एवढ्यांचा समावेश केला-  मंत्र्यांनी चांगले काम केल्यास प्रतिरूप मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन करावे, मात्र चुकीचं काम केल्यास सरकारचे वाभाढे काढावे

- गेल्या १४ वर्षात मनसेचे १३ आमदार अनेक नगरसेवक निवडून आले

- मनसेच्या आजच्या स्थितीवर टीका होते, पण ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची अवस्था काय

- दिल्लीत काँग्रेसचा अमदार एकही निवडून आला नाही, ७० पैकी ६३ ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले

- लाटा येतात, अनेकांना धक्के बसतात, २०१४ मध्ये मायावतींचा एकही खासदार निवडून आला नव्हता

- अनेक चढउतार पाहत असताना तुम्ही माझ्यासोबत राहिलात त्याबाबत धन्यवाद

- एवढे पराभव झाल्यानंतरही राज ठाकरेसोबत लोक राहतात कसे, याच गोष्टीचं  अनेकांना आश्चर्य वाटतं

- मनसेने अनेक आंदोलने केली, मनसे वगळता कुणी एवढी आंदोलने केलीत का, काही कामे पूर्णही झाली

- सत्तेवर असणाऱ्यांपेक्षा माझ्याकडून अपेक्षा, या अपेक्षांचं मी काय करू  

- इतर महत्त्वाचे मुद्दे येत्या २५ मार्चला मांडणार 

- प्रतिरूप मंत्रिमंडळात कुणालाही काम करायं असल्यास माझ्याशी संपर्क साधा

- सध्या देशात आरटीआय टाकून ब्लॅकमेल करणे हा उद्योग झालाय

-प्रतिरूप मंत्रिमंडळातील व्यक्तींनी आरटीआय टाकून ब्लॅकमेल करू नये

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र