शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

सहा लाख रहिवासी वाऱ्यावर

By admin | Updated: September 25, 2015 02:36 IST

सिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यास आले आहेत.

वैभव गायकर, पनवेलसिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यास आले आहेत. परंतु या नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. उद्यान, मैदान, मार्केट, बसडेपो, रिक्षा स्टँड, समाजमंदिर यासारख्या सुविधाही नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित केली. प्रकल्पग्रस्तांची १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेवून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने पहिल्यांदा बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर विकसित केला. तेथे प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान, मैदान, मार्केट,समाजमंदिर, शाळा यासाठी भूखंड राखून ठेवले. परंतु पनवेल तालुक्याचा विकास करताना मात्र नियोजनामध्ये प्रचंड त्रुटी ठेवल्या आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली असताना या परिसरातील प्रश्नांवर लक्ष वेधले. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे व उलवे परिसराचा विकास करण्यात आला आहे. मूळ गावठाण व विकसित नोडची लोकसंख्या ६ लाखपेक्षा जास्त झाली आहे. सिडकोने नागरिकांना भरमसाट आश्वासने दिली होती. परंतु त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. सिडकोने सेक्टरनिहाय चांगले मैदान व उद्यान विकसित केलेले नाही. एकही सुनियोजित मार्केट बांधलेले नाही. खारघर ते पनवेलपर्यंत फक्त एकच बस डेपो आहे. रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणी नियोजित रिक्षा व टॅक्सी स्टँडही नाही. सिडकोने नागरिकांच्या करमणुकीसाठी तालुक्यामध्ये एकही नाट्यगृह उभारलेले नाही. वाहनतळासाठी जागा ठेवलेली नाही. समाजमंदिरांचा अभाव आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा नाही. या परिसरात ६ लाखपेक्षा जास्त नागरिक रहात आहेत.