शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उरण-खारकोपर दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूकीचा आजपासून श्रीगणेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 19:46 IST

मधुकर ठाकूर उरण : ठिक ५.३९  मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरण - खारकोपर या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरील ...

मधुकर ठाकूर

उरण : ठिक ५.३९  मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरण- खारकोपर या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवाशांना घेऊन रेल्वे उरणहून खारकोपर स्थानकाच्या दिशेने रवाना झाली.त्यामुळे खऱ्या अर्थाने आज उरणकरांचे मागील ५० वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता  प्रवासी वाहतूकीसाठी शुक्रवारपासून खुला झाला आहे.

उरणकरांना आता १५ रुपयांत ४० मिनिटांत बेलापूरला पोहचणे शक्य होणार आहे.तसेच उरणहून मुंबई -सीएसटीला दीड तासात सहज पोहचता येणार आहे.यामुळे मोरा-भाऊचा धक्का आणि नव्याने सुरू झालेल्या शिवडी-न्हावा सेतूपेक्षाही कमी खर्चात मुंबईत जाता येणार आहे.उरण-खारकोपर रेल्वे प्रवासी मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी उरण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.दुतर्फा रेल्वे फलाट गर्दीने फुलून गेले होते.

भारत चीन युध्दाच्या पाश्र्वभूमीवर उरण नौदलाच्या गोदामापर्यंत रेल्वेने दारुगोळा वाहतूक करण्यासाठी कोटगाव येथील ८० शेतकऱ्यांच्या १४० एकर जमिन संपादित करण्यात आलेल्या आहेत. देशहिताच्या उद्देशाने ६० वर्षांपूर्वी कोटगाव येथील शेतकऱ्यांनी  जमीन कोणत्याही प्रकारचा विरोध न करता रेल्वेच्या स्वाधीन केल्या.मात्र त्याचा शेतकऱ्यांना ६० वर्षात अद्यापही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही.अथवा आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.उलट देशहिताच्या कामासाठी दिलेल्या जमिनीचा वापर आता सिडको - रेल्वे प्रशासन नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पासाठी करीत आहे.

कोटनाका-काळाधोंडा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य प्रकारे मोबदलाही देण्यात यावा, रेल्वे प्रकल्पात प्रकल्पबाधीतांना नोकरीतही सामावून घेण्यात यावा,भुमीपुत्रांना सुरू असलेल्या ठेकेदारीतील कामात प्राधान्य दिले जावे, व्यावसायिक गाळे मिळावेत यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रकल्पबाधीतांना न्याय मिळाला नाही.रेल्वे व सिडको प्रशासन दाद देण्यास तयार नाही.त्यातच रांजणपाडा स्थानकाचे नाव बदलून धुतुम , न्हावा -शेवा चे नवघर आणि द्रोणगिरी स्थानकाचे बोकडवीरा नाव करण्यासाठी ग्रामस्थांचा रेल्वे -सिडको विरोधात संघर्ष सुरू आहे.मात्र अद्यापही केंद्र सरकारने मागण्यांचे घोंगडे भिजतच ठेवले आहे.

टॅग्स :uran-acउरण