शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस, विभागीय बोर्डाकडून अतिरिक्त शुल्क आकारणाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 7:04 AM

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, नवी मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत, अशाप्रकारे विद्यार्थी तसेच पालकांची लूट करणाºया महाविद्यालयांवर कठोर कारवाई करणार ...

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, नवी मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत, अशाप्रकारे विद्यार्थी तसेच पालकांची लूट करणाºया महाविद्यालयांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला. अतिरिक्त शुल्क आकारणी प्रकरणी महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस देत, अशा महाविद्यालयांवर ठोस कारवाईचे संकेत बोर्डाच्या वतीने देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे आॅनलाइन पद्धतीने मंडळास प्राप्त झालेली असून, आवेदनपत्रातील दुरुस्तीकरिता प्री लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या दुरुस्त्या मंडळाकडून विनाशुल्क करण्यात आल्याचेही बोरसे यांनी स्पष्ट केले. प्रवेशपत्र मिळाल्यानंतरच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता, कनिष्ठ महाविद्यालयाने मंडळाकडे शुल्क जमा करणे आवश्यक आहे. अवास्तव शुल्क आकारणी करणाºया महाविद्यालयांना मात्र बोर्डाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविली जात असून, प्रशासकीय कारवाईचे संकेत या वेळी देण्यात आले आहेत. कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या महाविद्यालयाला संबंधितविषयी दोन दिवसांत खुलासा सादर करणे सक्तीचे आहे.अशाप्रकारे अतिरिक्त शुल्क आकारणी करणाºया महाविद्यालयांविषयी बोर्डाकडे तक्रार केल्यास त्वरित कारवाई करणार असल्याची माहिती विभागीय बोर्डाने दिली असून, विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.विद्यार्थ्यांचावेळ वायाहॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, शनिवारपासून तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार असूनही अभ्यासाला वेळ देता येत नाही. ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी आढळल्याने गोंधळ उडाला असून, महाविद्यालयाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. सलग तीन दिवस महाविद्यालयाला फेºया घालूनही विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.अभ्यास कधी करायचा?च्ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयसीएल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत, सलग तीन दिवस फेºया मारूनही काम झाले नसून, २०० ते ३०० रुपये शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याची माहिती दिली.च्महाविद्यालयात या प्रकरणी विचारणा केली असता, अरेरावीपणाची उत्तरे दिली जात असून, ‘तुमचे काम आहे, तुम्हाला रोज यावे लागेल’ अशी उत्तरे मिळत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आधी पैसे भरा, मगच दुरुस्ती केली जाईल, असा नियम केला असून विद्यार्थ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या