शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाण्यावर उद्योग चालवायचे का?, तळोजातील उद्योजकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:29 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते.

नवी मुंबई : ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची भीती आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने २६ मे रोजी घेतलेल्या बैठकीत बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ जूननंतर आता २३ जून असे दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारवीतून ठाणे जिल्ह्यातील महानगरांसह नवी मुंबईतील टीटीसी आणि तळोजा एमआयडीसीलाही पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा बंद केल्याने तळोजातील उद्योजक संतापले आहेत. आम्ही टँकरच्या पाण्यावर उद्योग चालवायचे का, असा प्रश्न त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होत होता. आता परंतु, अवघे ३८ एमएलडीच पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी एमआयडीसीने वळविले आहे. यामुळे तळोजातील अनेक उद्योग दीड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टँकर खरेदी करून आपले उद्योग चालवित आहेत. परंतु, असे महागडे पाणी घेऊन उद्योग कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांनी सोमवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.हे कमी म्हणून की काय आता एमआयडीसीने बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबईसह डोंबिवली, अंबरनाथ आणि तळोजा एमआयडीसीतील उद्योगांचा पाणीपुरवठा आधी १६ जून आणि आता २३ जून रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा पाऊस लांबला आहे. आता २० जून ओलांडला तरी पावसाचा एक थेंब पडलेला नाही. धरणात पाणीसाठा कमी झाल्याने ही कपात आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांसह उद्योगांना बसत आहे. यात तळोजातील उद्योग अधिकच भरडले गेले आहेत. टँकरचे महागडे आणि तोकडे पाणी वापरण्यापेक्षा उद्योग बंद केलेले बरे, टँकरच्या पाण्यावर किती दिवस ते चालवायचे असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई