शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

टँकरच्या पाण्यावर उद्योग चालवायचे का?, तळोजातील उद्योजकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:29 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते.

नवी मुंबई : ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची भीती आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने २६ मे रोजी घेतलेल्या बैठकीत बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ जूननंतर आता २३ जून असे दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारवीतून ठाणे जिल्ह्यातील महानगरांसह नवी मुंबईतील टीटीसी आणि तळोजा एमआयडीसीलाही पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा बंद केल्याने तळोजातील उद्योजक संतापले आहेत. आम्ही टँकरच्या पाण्यावर उद्योग चालवायचे का, असा प्रश्न त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होत होता. आता परंतु, अवघे ३८ एमएलडीच पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी एमआयडीसीने वळविले आहे. यामुळे तळोजातील अनेक उद्योग दीड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टँकर खरेदी करून आपले उद्योग चालवित आहेत. परंतु, असे महागडे पाणी घेऊन उद्योग कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांनी सोमवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.हे कमी म्हणून की काय आता एमआयडीसीने बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबईसह डोंबिवली, अंबरनाथ आणि तळोजा एमआयडीसीतील उद्योगांचा पाणीपुरवठा आधी १६ जून आणि आता २३ जून रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा पाऊस लांबला आहे. आता २० जून ओलांडला तरी पावसाचा एक थेंब पडलेला नाही. धरणात पाणीसाठा कमी झाल्याने ही कपात आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांसह उद्योगांना बसत आहे. यात तळोजातील उद्योग अधिकच भरडले गेले आहेत. टँकरचे महागडे आणि तोकडे पाणी वापरण्यापेक्षा उद्योग बंद केलेले बरे, टँकरच्या पाण्यावर किती दिवस ते चालवायचे असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई