शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:35 IST

Navi Mumbai Fire: खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला.

 नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला. तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. 

सकाळी १० च्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रिज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर, डांबरगोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना एका मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला मात्र, काही क्षणात कापरच्या पावडरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगरांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूरसाठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या दोन कंपन्यांमध्ये आग पसरली. 

आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी, पालिका, ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे-मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, कापूर व डांबरगोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

पाण्याचा तुटवडाआग आटोक्यात आणण्यासाठी सातहून अधिक बंब तर २० हून अधिक टँकर बचावकार्यात गुंतले होते. बचावकार्य सुरू असताना पहिल्या तासातच पाण्याचा तुटवडा भासून त्यात खंड पडला. अखेर परिसरातल्या कंपन्यांमधून पाणी घेऊन पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली. त्यातही टाकीतले  पाणी थेट बंबात सोडता येत नसल्याने अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आगीच्या झळाआग शमविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या थेट तोंडावर आगीच्या झळा बसत होत्या. अचानक आगीचा भडका उडत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये काहींच्या डोळ्यांना तसेच चेहऱ्यावर किरकोळ दुखापती झाल्या आहेत. 

पाण्यामुळे आणखी पसरली आगआग शमविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. कंपनीतून बाहेर येणाऱ्या त्या पाण्यासोबत कापूर व केमिकलदेखील वाहू लागले. या रसायनमिश्रित पाण्यानेही पेट घेतला. हे पाणी लगतच्या गोयंका व जस्मिन आर्ट या दोन कंपन्यांमध्ये वाहत गेल्याने तिथेही आग लागली. शिवाय रस्त्यालगतचे महावितरणचे विद्युत ट्रान्स्फार्मरदेखील जळाले. अखेर अग्निशमन दलाने फोमचा वापर करून रस्त्यावरून वाहणारे आगीचे लोट नियंत्रणात आणले.

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई