शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:35 IST

Navi Mumbai Fire: खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला.

 नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला. तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. 

सकाळी १० च्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रिज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर, डांबरगोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना एका मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला मात्र, काही क्षणात कापरच्या पावडरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगरांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूरसाठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या दोन कंपन्यांमध्ये आग पसरली. 

आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी, पालिका, ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे-मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, कापूर व डांबरगोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

पाण्याचा तुटवडाआग आटोक्यात आणण्यासाठी सातहून अधिक बंब तर २० हून अधिक टँकर बचावकार्यात गुंतले होते. बचावकार्य सुरू असताना पहिल्या तासातच पाण्याचा तुटवडा भासून त्यात खंड पडला. अखेर परिसरातल्या कंपन्यांमधून पाणी घेऊन पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली. त्यातही टाकीतले  पाणी थेट बंबात सोडता येत नसल्याने अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आगीच्या झळाआग शमविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या थेट तोंडावर आगीच्या झळा बसत होत्या. अचानक आगीचा भडका उडत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये काहींच्या डोळ्यांना तसेच चेहऱ्यावर किरकोळ दुखापती झाल्या आहेत. 

पाण्यामुळे आणखी पसरली आगआग शमविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. कंपनीतून बाहेर येणाऱ्या त्या पाण्यासोबत कापूर व केमिकलदेखील वाहू लागले. या रसायनमिश्रित पाण्यानेही पेट घेतला. हे पाणी लगतच्या गोयंका व जस्मिन आर्ट या दोन कंपन्यांमध्ये वाहत गेल्याने तिथेही आग लागली. शिवाय रस्त्यालगतचे महावितरणचे विद्युत ट्रान्स्फार्मरदेखील जळाले. अखेर अग्निशमन दलाने फोमचा वापर करून रस्त्यावरून वाहणारे आगीचे लोट नियंत्रणात आणले.

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई