शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

धक्कादायक! रुग्णालयाच्या शवागारातून मृतदेह बेपत्ता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 15:45 IST

अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आले असता हा प्रकार उघड झाला.

नवी मुंबई - आजारामुळे मृत पावलेल्या तरुणाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. उलवे येथील 29 वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असून, अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आले असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान अनेक मृतदेहांमध्ये तरुणाच्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

उलवे येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाला प्रकृतीच्या कारणावरून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो मूळचा पश्चिम बंगालचा असून उलवेत एकटाच रहायचा. प्रकृतीच्या कारणावरून त्याचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना चाचणीसाठी मृतदेह 9 मे रोजी वाशीतील पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला होता. एनआरआय पोलिसांमार्फत पंचनामा करून हा मृतदेह वाशी रुग्णालयात पाठवण्यात आलेला. त्याठिकाणी चाचणी झाल्यानंतर 15 तारखेला त्या मयत तरुणाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना रुग्णालयातर्फे कळवण्यात आले होते. या कालावधीत मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. परंतु मयत भावाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळताच, मयत तरुणाचा भाऊ शनिवारी वाशीतील पालिका रुग्णालयात गेला. त्याने अंत्यविधीसाठी मृतदेहाची मागणी केली. यावेळी मृतदेह शोधण्यास उशीर लागत असल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. तर रात्रभर वाट पाहिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी पून्हा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी शवागारात असलेले मृतदेह दाखवून देखील त्या मयत तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली नाही. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाचा थरकाप उडाला आहे. 

दरम्यान भावाचा मृतदेह मिळत नसल्याने त्याने वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता, रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत तपासाचा भाग असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे. 

त्यांच्याकडून सोमवारी सकाळपासून चौकशीला सुरवात करण्यात आली आहे. 9 मे पासून रुग्णालयात आलेले मृतदेह व संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले मृतदेह यांची माहिती तपासली जात आहे.  शिवाय वाशी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचा गलथानपणा असल्याचा आरोप मयत तरुणाच्या भावाकडून होत आहे. तर मृतदेहाची पाठवणूक करताना पोलिसांकडून योग्यरीत्या टॅगिंग झाले नसल्याच्या शकत्येचाही आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे. मात्र या हलगर्जीमुळे सदर तरुणाच्या मृतदेहाची अदलाबदल होऊन तो दुसऱ्या कोणाच्या ताब्यात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मृतदेह रुग्णालयात पाठवण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांची होती. शिवाय जर कोरोना चाचणी होईपर्यंत मृतदेह रुग्णालयात होता, त्यानंतर तो रुग्णालयातून गहाळ झाला असल्यास रुग्णालय व्यवस्थापनच त्याला जबाबदार असल्याचाही आरोप होत आहे.

शहरातील एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास कोरोना चाचणीसाठी तो ताब्यात घेतला जात आहे. या चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात आहे. त्यामध्ये साधारण 4/5 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे शवागारात मृतदेहांची संख्या वाढत आहे. सध्यस्थितीला पालिकेच्या वाशीतील रुग्णालयात 37 मृतदेह आहेत. ते सर्व मृतदेह मयत तरुणाच्या भावाला दाखवण्यात आले आहेत. परंतु त्यामधून मयत तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. यामुळे शवागारातून मृतदेह गहाळ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता तो झाला नाही. 

तर मृतदेह गहाळ झाल्याप्रकरणी अद्याप कसलाही गुन्हा दाखल नसून पालिकेचा अंतर्गत तपासाचा भाग असून, त्यांच्या स्पष्टोक्ती नंतर योग्य कारवाई केली जाईल असे परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल