शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शरद पवार यांची साथ सोडणार नाही - नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 01:11 IST

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून सुमारे ४० हजारांचे मताधिक्य मिळाले.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईतून ८० हजार मतांची आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काळाची पावले ओळखून नाईक यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करावा, असा काही कार्यकर्त्यांचा सूर आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी जाहीर केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आत्मकेंद्रित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून सुमारे ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना निसटता विजय मिळाला. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या. नाईक भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत, याबाबत राजकीय गप्पा रंगात आल्या होत्या. याबाबत मौन बाळगून नाईकांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढविला. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था दूर केली.

महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळवित नाईकांनी नवी मुंबईतील सत्ता आपल्याकडे कायम ठेवली; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार संदीप नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराममतदारांचा बदलता कल लक्षात घेऊन नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, पराभव झाला तरी शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी या बैठकीत मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्याचे समजते. यावरून तूर्तास नाईक यांच्याविषयी सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार