शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : खारघर शहरातील नागरी वस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:25 IST

खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल: खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थर रोड कारागृहात झालेल्या कोरोनाच्या शिरकावाच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, रहदारीच्या व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यात आल्याने, मनसेने आक्रमक भूमिका घेत या विलगीकरण केंद्राला इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता २,१२४ असून, सध्या कारागृहात दोन हजारांहून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. एप्रिल महिन्यात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सावध भूमिका घेत, नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी खारघरमधील गोखले शाळेत विलगीकरण केंद्राची निर्मिती केली. सुरुवातीला केवळ २० कैदी होते. त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली असून, सध्या २०० हून अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०० कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ ११ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात दिवसा पाच, तर रात्रपाळीसाठी सहा पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याचे समजले, तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शाळेच्या सर्व खोल्या कैद्यांनी भरल्या आहेत. खारघर शहरातील गोखले शाळा हे ठिकाण सेक्टर १२ मधील रहदारीच्या व दाट लोकवस्तीचे असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी लोकवस्ती असल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कैद्यांना इतरत्र हलविण्याची मागणी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मनसेने शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.कारागृह प्रशासनामार्फत कैद्यांना खारघर शहरातील गोखले शाळेत विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पालिका प्रशासनाचे यामध्ये कोणतेही हस्तक्षेप नसल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.>खारघर शहरात शहराच्या अवतीभोवती कैद्यांना ठेवण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असताना अशाप्रकारे शहराच्या मध्यभागी दाट लोकवस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र स्थापन करणे चुकीचे आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागू शकतो. याकरिता हे विलगीकरण केंद्राचे इतरत्र स्थलांतर करावे, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे.- प्रसाद परब (मनसे, खारघर शहर अध्यक्ष)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस