शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांपासून फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:07 AM

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.

मयूर तांबडे पनवेल : पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असल्याचे बोलले जात आहे.शालेय पोषण आहाराचे धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने, तालुक्यातील पहिली ते आठवीमधील हजारो विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५९ शाळा आहेत. काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उधारीवर काम सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत शाळांमधील शालेय पोषण आहार कसातरी चालू होता. सध्या अनेक शाळेत साहित्याचा साठा संपला आहे. ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. शाळेतील शिल्लक साहित्य पूर्णत: संपले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जातो की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने अधीक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्षच नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत; पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तीन ते चार महिन्यांपासून अनेक ठिकाणी तांदळाचा पुरवठा केला गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे कठीण झाले आहे.पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. जून महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. दिवाळीपूर्वी काही शाळांत तांदूळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रु पये खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. काही शाळांत पोषण आहार देणे सुरू आहे, तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीने शिक्षक शालेय पोषण आहाराबाबत काही बोलण्यास तयार होत नाहीत.>शालेय पोषण आहारातील धान्य संपल्यामुळे मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे.>नियोजन नसल्याने अडचणप्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे; पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.>पोषण आहाराचे धान्य आपल्याकडे आलेले नाही. शाळा सुरू झाल्यापासून धान्याचे वाटप झालेले नाही. ज्या शाळांकडे धान्य शिल्लक होते, त्यांच्याकडून ते बाकीच्या शाळांना देणे सुरू आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे ८ दिवसांपूर्वी कळवलेले आहे. संपलेल्या धान्यांचा शाळानिहाय आढावा घेत आहोत.- रंजना चास्कर,गटशिक्षण अधिकारी,पनवेल पंचायत समिती