शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरहेड लाइनवरील स्फोटाने नागरिक भयभीत

By admin | Updated: May 29, 2017 06:34 IST

कोयना प्रकल्पातून निघालेली महापारेषणची ओव्हरहेड लाइन महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून गेली आहे. जंगल, डोंगर आणि

सिकंदर अनवारे/ लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोयना प्रकल्पातून निघालेली महापारेषणची ओव्हरहेड लाइन महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून गेली आहे. जंगल, डोंगर आणि रहिवासी भागातूनही लाइन गेली असून उंच झाडे आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे शॉर्टसर्किट होऊन स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी दुपारी महाड तालुक्यातील टोळ या गावाच्या परिसरात अचानक लाइन शॉर्टसर्किट होऊन दोन मोठे स्फोट झाले. स्फोट कशाचे सुरुवातीला नागरिकांना समजले नाही. मात्र तीव्रता एवढी होती की संपूर्ण परिसर हादरुन गेला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते.महाराष्ट्र शासनामार्फत वीज उत्पादन करणाऱ्या महापारेषण या निमखासगी कंपनीची ओव्हरहेड लाइन महाडच्या खाडीपट्ट्यातून गेली आहे. या लाइनमधून ४०० केव्ही इतका प्रचंड वीज प्रवाह वाहत असतो. डोंगर आणि जंगल भागासहित रहिवासी भागातून देखीलही लाइन टाकण्यात आली आहे. उंच टॉवरवर या तारा खेचण्यात आल्या असल्या तरी विजेचा दाब प्रचंड असल्याने तारेच्या संपर्कात कोणतीही प्रत्यक्ष वस्तू आली नाही तरी क्षेत्रात येणाऱ्या वस्तूमुळे देखील या ठिकाणी स्फोटाप्रमाणे आवाज आणि आगीचे लोट निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात हे प्रमाण जरी कमी असले तरी पावसाळ्यात मात्र वाढते. रिमझिम पाऊस अगर धुकेसदृश वातावरण असल्यास या लाइनखालून माणसांना अंगातून मुंग्या येणे अगर सौम्य शॉक लागण्यासारखे त्रास होत आहेत.शनिवारी दुपारी महाड तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील टोळगाव येथे रहिवासी भागालगत असलेल्या डोंगर भागात स्फोट आणि आगीचे लोट दिसून आले. प्रचंड मोठा आवाज झालेल्या या शॉर्टसर्किट स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट कशामुळे झाला? काही काळ ग्रामस्थांना कळू शकले नाही. आगीचे लोट निघाल्यानंतर टोळ ग्रामस्थांनी महापारेषणच्या नागोठणे येथील कार्यालयामध्ये तक्रार नोंदविल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषणचे संदीप चौधरी यांनी त्या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. कोणतीही धोकादायक परिस्थिती नसल्याचा निर्वाळा टोळ ग्रामस्थांना दिला. तांत्रिकदृष्ट्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार धोकादायक परिस्थिती नसली तरी ४०० के व्हीच्या या लाइनमुळे होणारे स्फोट आणि आगीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.ही लाइन ४०० के व्हीची आहे. या लाइनच्या इन्डक्शन रेंजमध्ये जर एखादे झाड अगर फांदी आली तर अशा प्रकारे ब्लास्ट होऊन आवाज होतो. ही मोठी घटना नाही, तर सर्वसाधारण घटना आहे. घटना घडली तर मायक्रो सेकंदामध्ये लाइन ट्रीप होते. ४०० क ेव्ही ही नागोठणे दाभोळ लाइन १ व २ (एक व दोन ) या महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या अति उच्चता वाहिन्या आहेत. खाली उंच झाडे असणे हे जीवित व वित्तहानीला कारणीभूत होऊ शकते, हे होऊ नये यासाठी ४०० के व्ही लाइन उपविभाग नागेठणे तर्फे वेळोवेळी लाइनच्या खालच्या झाडांची तोड करण्यात येते. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- संदीप चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नागोठणे रहिवासी भागातून टाकली लाइन१टोळ येथील ग्रामस्थ निजाम जलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०० के व्हीची ही लाइन टोळ गावापासून डोंगर भागातून पुढे नांदवी मार्गे जाणार होती, मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे गाव वाचवण्याचा आरोप जलाल यांनी केला आहे. २ही लाइन टाकताना शेतकऱ्यांची जमीन बळकावली. शेतजमीन अगर जंगली जमिनीचा मोबदला दिला नाही यामुळे टोळ भागात रहिवासी भागाबरोबरच येथील रहिवाशांच्या शेतीवर आधारित उत्पन्नाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. ३या लाइनसाठी ज्या ज्या ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना जमीन मोबदला मिळावा आणि रहिवासी भागातील धोका कमी करावा अशी मागणी निजाम जलाल यांनी केली आहे. येथील ग्रामस्थ देखील सुरुवातीपासून या मागणीसाठी पाठपुरावा शासन दरबारी करीत आहेत.