शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

 दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृतीसाठी साल्हेर ते पारगड मोहीम; ७०० किलोमीटरची पदभ्रमंती  

By नामदेव मोरे | Updated: November 18, 2023 18:50 IST

या भ्रमंतीदरम्यान नागरिकांमध्ये गडसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी बा रायगड परिवार संस्थेच्या चार सदस्यांनी साल्हेर ते पारगड पदभ्रमंती मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या कुशीतून जवळपास ७०० किलोमीटर अंतर पार करून वाटेतील गड-किल्ल्यांना भेटी देण्यात येणार आहेत. या भ्रमंतीदरम्यान नागरिकांमध्ये गडसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

गड संवर्धनासाठी श्रमदान मोहीम राबविणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये बा रायगड परिवाराचाही समावेश आहे. सुधागडसह अनेक किल्ल्यांवर नियमित संवर्धनाचे काम सुरू आहे. नागरिकांसाठी किल्ले दर्शनासाठी मोहिमांचेही आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य संतोष आलम, चेतन चव्हाण, संदीप धोदरे व संदीप चौगुले यांनी दि. १६ नोव्हेंबरपासून दुर्ग साल्हेर ते दुर्ग पारगड अशी पदभ्रमंती मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या पश्चिम घाटामधील उत्तर दक्षिण या डोंगर रांगांमधून ही भ्रमंती केली जाणार आहे. या वाटेमध्ये जवळपास ४१ किल्ले आहेत. यामधील जास्तीत जास्त किल्ल्यांनाही मोहिमेदरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत. गड, किल्ले हेच महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव आहे. हे वैभव टिकले पाहिजे, त्याचे संवर्धन झाले पाहिजे. संवर्धनाच्या मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने त्यांचे योगदान दिले पाहिजे. गडसंवर्धनासाठी जनजागृती व्हावी व ही चळवळ घराघरामध्ये पोहोचविण्यासाठीची जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील साल्हेर ते कोल्हापूरमधील पारगडपर्यंतच्या या मोहिमेमध्ये इतर शिवप्रेमी नागरिकही सहभागी होणार आहेत. साल्हेरपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जवळपास एक महिना पदभ्रमंती सुरू राहणार आहे. वाटेतील गावांमध्ये व जिथे जागा मिळेल तेथे मुक्काम करून भेटणाऱ्या नागरिकांना गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी साल्हेर ते पारगड मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या डाेंगररांगेतून प्रवास करताना वाटेतील गड-किल्ल्यांना भेट देण्यात येणार आहे. - संतोष आलम, सदस्य, बा रायगड परिवार

अभियानाच्या वाटेवरील ठिकाणेसाल्हेर, सलोटा, हातगड, वाघेरा, भास्करगड, त्रिंगलवाडी, कळसुबाई, कुलंग, मदन, अलंग, रतनगड, कात्राबाई खिंड, हरिश्चंद्रगड, सिंदोळा, नाणेघाट, ढाकोबा, भीमाशंकर, भोरगिरी, कुसूरपठार, ढाकगड, राजमाची, कोरीगड, घनगड, ताम्हीणी, कोकणदिवा, कावल्या बावल्या खिंड, रायगड, माधेघाट, मोहनगड, कोळेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड, मधुमकरंद गड, महिमानगड, वासोटा, जंगली जयगड, भैरवगड, विशाळगड, मुदगड, गगनबावडा, पारगड. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई