शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सलग सुट्यांमुळे भाजीपाल्याची विक्री मंदावली, २० टक्के माल शिल्लक

By नामदेव मोरे | Updated: May 1, 2023 17:01 IST

फरसबीसह गाजर तेजीत : वाटाणा कोथिंबीरचे दर घसरले

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कामगार दिन असूनही मुंबईकरांना भाजीपाला वेळेत पोहचविता यावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितिचे भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. मार्केटमध्ये आवक समाधानकारक झाली परंतु सलग सुट्या असल्यामुळे विक्री मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. १५ ते २० टक्के मालाची विक्री झाली नाही. गत आठवड्याच्या तुलनेमध्ये फरसबी, शेवगा, आवळ्याचे दर तेजीत असून वाटाणा व कोथिंबीरचे दर घसरले आहेत.

बाजार समितीमध्ये सोमवारी २९१ ट्रक व २६० टेम्पो अशा ६०० वाहनांमधून २८९६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला. यामध्ये ४ लाख ४ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. नाशिक, पुणे, सातारा, नगर व राज्याच्या विविध भागातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. गुजरात व दक्षीणेसह उत्तरेकडील राज्यांमधूनही कृषी मालाची आवक सुरू आहे. कोथिंबीरच्या १ लाख ५८ हजार जुडीची आवक झाली आहे. गत आठवड्यात १५ ते ३० रुपये जुडी दराने विकली जाणारी कोथिंबीर सोमवारी १० त २० रुपयांनी विकली जात होती. पालकची आवकही वाढली आहे. गत आठवड्यात वाटाणा ५० ते ७५ रुपये किलो दराने विकला जात होता. त्याचे दर ५० ते ६५ रुपये झाले आहेत.

आवळा ३४ ते ४४ वरून ३८ ते ४६ रुपये किलो, फरसबी ३० ते ५० वरून ५५ ते ७५ रुपये, दुधी १८ ते २२ वरून २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे चाकरमानी गावी जात असल्यामुळे ग्राहक काही प्रमाणात कमी आहे. बाजारभावामध्येही चढ- उतार होत आहेत. मे महिन्यामध्येही मागणी थोडी कमीच राहील असेही त्यांनी सांगितले.

एपीएमसीमधील भाजीपाल्याचे प्रतीकिलो बाजारभाव वस्तू - २४ एप्रिल - १ मे

  • आवळा - ३४ ते ४४ - ३८ ते ४६
  • भेंडी - २५ ते ४० - २५ ते ३२
  • दुधी भोपळा - १८ ते २२ - २० ते ३०
  • फरसबी - ३० ते ५० - ५५ ते ७५
  • फ्लॉवर - १० ते १६ - १० ते १२
  • गाजर - २० ते २६ - २५ ते ३०
  • कोबी ७ ते ९ - ७ ते १२
  • शेवगा शेंग - १८ ते २६ - २४ ते ३०
  • वाटाणा ५० ते ७५ - ५० ते ६५
  • कोथिंबीर - १५ ते ३० - १० ते २०
टॅग्स :vegetableभाज्या