शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 11:56 IST

खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे इच्छुक होते. त्यासाठी, सर्वपक्षीय आमदारांकडे त्यांनी मतदान करण्याची मागणीही केली होती. त्यात, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यामुळे, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप त्यांनी केला होता. आता, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेनेवर संभाजीराजे समर्थकांकडून टिका करण्यात येत आहे.

खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. त्यातच, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं दिलेला 6 वा उमेदवार पराभूत झाल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवसेनेला लक्ष्य केलं. त्यांनी कुठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. मात्र, शिवसेनेला टोला लगावला. तर, आता नवी मुंबईत संभाजीराजेंच्या समर्थनार्थ बॅनर झळकले आहेत. 

बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. "शिवरायांच्या गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार", असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, "आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा". राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, अशा आशयाचे बॅनर मुंबईत चर्चेचा विषय ठरत आहेत. 

खासदार संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरली. अपक्ष आणि लहान पक्षांतील आमदारांना आपलंसं करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे, 6 व्या जागेवर शिवसेना उमेदवार पराभूत झाला. भाजपचे धनंजय महाडिक खासदार झाले.

संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

माजी खासदार संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं llतुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll संभाजीराजेंच्या या ट्विटचा अर्थ अनेकांना जाणून घ्यायचा आहे. तुकोबांच्या अभंगातील या ओवी असून 'वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही', असा मतीत अर्थ या ट्विटचा आहे. वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. !तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. !!असा या तुकोबांच्या अभंगातील ओवींचा अर्थ आहे. दरम्यान, तत्पूर्वी एक दिवस अगोदरही संभाजीराजेंनी ट्विट केलं होतं. ''कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार.'', असे त्यांनी ट्विटमधून म्हटले होते. 

रायगडावरुनही साधला होता निणाशा

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून संभाजीराजेंनी सूचक विधान करत शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. शिवाजी महाराजांविरोधात अनेक बादशाही उभ्या होत्या. कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही यांना सुद्धा लक्षात आले शिवाजी महाराज काहीतरी वेगळे रुप आहेत. शिवाजी महाराजांना अडवायला हवं. मग काय करायला हवं? त्यांनी ठरवलं बाप-लेकात भांडणं लावायची. शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यात भांडणं लावली आणि शहाजीराजेंवर दबाव आणला. शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे, असे म्हणत त्यांनी नाव ने घेता शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक